HW News Marathi
मुंबई

उद्धव ने निच राजकारण खेळले ….आता हातवर टाळी नाही तर कानाखाली

– राज यांचा उद्धव आणि कंपनीवर हल्लाबोल

मुंबई- उद्धव आणि त्याच्या सहकार्यानी निच राजकीय खेळी केली. हे कधीही विसरणार नाही हे शिवसेनेच्या लक्षात येईल अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लोबोल करत आपले मन मोकळे केले. या पुढे टाळी नाही तर कानाखाली असं सुचक वक्तव्य त्यांनी केलं.

शिवसेनेने नीच राजकारण खेळलं, हे सर्वांना कवळलंय असं राज ठाकरे म्हणाले.

मला पाठवायचे असते तर मी सातही नगरसेवक पाठवले असते, सोशल मीडियावरुन अफवा पसरवल्या जात आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं.

सेनेतून बाहेर पडताना अनेक आमदार, नेते सोबत यायला तयार होते, पण पक्ष फोडून राजकारण करायचं नव्हतं.

फोडाफोडीचं राजकारण बाळासाहेबांनी कधी शिकवलं नाही. उद्धवच्या निच राजकारणा मुळेच शिवसेना सोडल्याचेही ते म्हणाले. मनसेचे बंडखोर नगरसेवक हे दळभद्री आहेत त्यांना पाच पाच कोटी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय शिवसेने कडून अशा राजकारणाची अपेक्षा नव्हती असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे नगरसेवक म्हणतात, ‘पक्षाने आम्हाला कधी 2 रुपये दिले नाही, पण दुसऱ्यांना 5-5 कोटी दिले.

‘लोक विश्वासानं माणसं निवडून देतात’ हा लोकांचा विश्वासघात असल्याचं त्यांनी सांगितले. राज यांचा संताप पहाता येत्या काळात शिवसेना व मनसे यांच्यातला संघर्ष अटळ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई

News Desk

वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष

News Desk

मुंबईसह उपनगरात महिला गोविंदा दहीहंडीसाठी सज्ज

News Desk