HW News Marathi
मुंबई

स्वातंत्र दिनी राणीच्या बागेत चिमुकल्याचे आगमन

मुंबई | स्वातंत्र दिनी देशात जन्माला येणारा पहिलाच पेंग्विनचा जन्म मुंबईच्या राणीच्या बागेत झाला आहे. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात एक नवीन चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोडप्याला आज बाळ झाले आहे. गेल्या ४० दिवस अंड्याला ऊब दिल्यानंतर बुधवारी रात्री त्यातून बेबी पेंग्वीन जन्मला आहे. शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात एक पेंग्वीन जन्माला आल्याची माहिती दिली.

या नव्या पाहुण्याच्या आगमनाने उद्यान्यातील सर्व कर्मचाऱ्यांनाही आनंद झाला आहे. बुधवारी अडीच वर्षीय हेबोल्ट पेंग्विनच्या अंड्याला आज ४० दिवस पूर्ण झाले आहेत. पेंग्विनची अंडी फुटुन बाहेर येण्याचा कालावधी हा ४० ते ४५ दिवसांचा असतो, असे देखील राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिडे गुरुजींच्या अटकेचा प्रश्न विधानसभेत

News Desk

पंतप्रधान मोदींचा आज एकदिवसीय मुंबई दौरा; विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम

Aprna

लाईफलाईन ठरतेय डेथलाईन

Arati More