HW News Marathi
मुंबई

स्वातंत्र्यदिनी मुंबईत ‘अल्ट्रा रन’

मुंबई । येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी ‘मुंबई अल्ट्रा -१२ तास रन’च्या पाचव्या पर्वामध्ये सुमारे पाचशे स्पर्धक आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी दोन हजार समर्थक धावणार आहेत. जे धावूच शकत नाहीत, त्यांनी किमान १२ मिनिटे तरी धावावे, यासाठी ‘वेलनेस ओव्हर इलनेस ’ हा संदेश यानिमित्ताने देण्यात येणार आहे. ऐंशी वर्षांचे डॉ. पी. एस्. रमाणी हे या ‘रन’चे ब्रॅण्ड अम्बेसेडर असून ते स्वत: १२ तास धावणार आहेत.

धावण्याच्या या कालावधीत धावपटूंना त्यांच्या गरजेनुसार खाण्यापिण्याची आणि काही काळ विश्रांती घेण्याची देखील मुभा राहणार आहे. १२ तासांचे हे अंतर ४२.२ किलोमीटरचे आहे. शिवाजी पार्क येथून पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणार्‍या या मॅरेथॉन रनचा सायंकाळी पाच वाजता समारोप अपेक्षित आहे. स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रत्येकाला पदक देण्यात येणार आहे. धावपटूंना आवश्यकता भासल्यास उपाचारासाठी धावण्याच्या मार्गांवर तज्ज्ञ डॉक्टर आणि १०८ रुग्णवाहिकाही असणार आहेत.

‘एडलवाइज ग्रुप’चे पाठबळ लाभलेल्या या स्पर्धेतील प्रवेश शुल्काचा निधी कर्करोगग्रस्तांवर उपचार करर्‍यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे ‘मुंबई अल्ट्रा -१२ तास रन’चे संचालक सॅविओ डिसोझा यांनी सांगितले. रेसच्या वैद्यकीय संचालिका गायत्री ठाकूर यांनी सांगितले की, धावण्याच्या वेळी एखाद्याला थकवा जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना स्पर्धेतून माघार घेणे बंधनकारक राहील. यावेळी उषा सोनम यांनी धावण्याऐवजी चालत का होईना, पण स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणात १७०० दुकानदार रस्त्यावर

Gauri Tilekar

ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk

झोपमोड करणारे मेट्रो 3चे काम थांबणार

News Desk