HW News Marathi
मुंबई

वाशी खाडी पूल दुरुस्तीसाठी बंद

नवी मुंबई – वाशी खाडी पूल २३ जानेवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-पुणे वाहतुकीला मोठा फटका बसणार आहे. या कालावधीत मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहनांची वाहतूक जुन्या खाडी पुलावरुन वळवण्यात येणार आहे. दरम्यान अवजड वाहतूक एरोलीमार्गे ठाणे-बेलापूर मार्गेवरुन पुढे वळवण्यात आली आहे.

या नवीन वाशी खाडी पूलावर मुंबई-पुणे तसेच गोव्याला ये-जा करणाऱ्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. या मार्गावरील वाशी खाडी पूलाच्या लोखंडी जॉइंडरची झीज झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी पुढील २० दिवसात हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

नवी मुंबई – पुणे जाणाऱ्या हलक्या वाहनानांसाठी जुन्या खाडी पुलाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पण, जुन्या खाडी पुलावर अवजड वाहनांना बंदी असल्यामुळे ही वाहने एरोलीमार्गे ठाणे-बेलापूर मार्गेवरुन पुढे जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द

News Desk

पहिल्या पावसात मुंबईकरांची तारांबळ उडाली, मध्य-पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Chetan Kirdat
महाराष्ट्र

सरकार म्हणजे बश्या बैल, यांना रुमण्याचा हिसका दाखवावाच -अजितदादा पवार

swarit

नांदेड ( उमरी ) – शेतकऱ्यांशी आणि शेतीशी या सरकारचा काहीच संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित यांनी जनतेला केले. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलना निमित्ताने आयोजित केलेल्या उमरी येथील सभेला संबोधीत करताना ते बोलत होते.

अजित पवार यांच्या भाषणाआधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली. मुंडे म्हणाले की मुख्यमंत्री जरी म्हटले की ते शेतकरी आहेत तरी ते कोणत्याही बाजूने शेतकरी दिसत नाही. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत श्री अजितदादा पवार म्हणाले की, या सरकारमधील लोकांना गाय, बैल, रेडकू यातला फरक कळत नाही. यांना शेतीतले काहीच समजत नाही तेव्हा या सरकारला वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवाच

या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री अनिल देशमुख, नांदेड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, माजी खा. गंगाधररावजी कुंटूरकर, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी महिला काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

Related posts

आपल्या कार्यकर्त्यासाठी भाजप रस्त्यावर, संजय राऊतांचा भाजपला टोला

News Desk

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाचा वेग वाढवावा! – उद्धव ठाकरे

Aprna

मुंबई महानगरपालिकेचा ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

News Desk