HW News Marathi
मुंबई

व्हिसीला बडतर्फ केले मग व्हिटीला कधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई – मुंबई विद्यापिठात निकालांचा झालेला गोंधळाला विद्यापिठाते व्हाईस चांसलर म्हणजे व्हिसी डॉ. संजय देशमुख यांना जबाबदार धरत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. मात्र सर्व जबाबदारी व्हिसींवर टाकून त्यांना बडतर्फ करणे ही पळवाट आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. व्हिंसींना जर बडतर्फ केले जात असेल तर शिक्षण खाते सांभाळणारे शिक्षण मंत्री व्हिटी म्हणजेच विनोद तावडेंनाही बडतर्फ केले पाहीजे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. मलिक यांनी यावेळी तावडे यांची संभावना व्हि. टी. अशी केली. तावडे हे अकार्यक्षम मंत्री असल्याचा घणाघातही त्यांनी केला. बोगेस डिग्री घेणारा शिक्षण मंत्री बोगस काम करत आहे असा टोलाही त्यांनी तावडेंना लगावला.

मुंबई विद्यापिठाचे संपूर्ण जगात एक वेगळे स्थान आहे. पण या निकाल प्रकरणा वरून संपूर्ण जगात या विद्यापिठाची नाचक्की झाली आहे. त्याला देशमुख आणि तावडे हे दोघेही जबाबदार आहेत. देशमुख यांचा राजिनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने वारंवार केली होती. मात्र त्यांना अभय दिला जात होता. आता त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तशीच कारवाई आता मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांवर करावी असेही ते म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक

News Desk

तृतीय पंथीयांना एक टक्का आरक्षण द्या

News Desk

ओला-उबेर चालक असंख्य मागण्यासाठी रस्त्यावर, बेमुदत बंदचा इशारा

swarit
Uncategorized

राहुल गांधीं बरोबर हात मिळवणी सर्वांसमोर करेन !

News Desk

अहमदाबाद – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बरोबर हातमिळवणी करायची असेल तर ती सर्वांच्या समोर करेन असे सांगत राहुल गांधी बरोबर गुप्त बैठक झाल्याचे वृत्त पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल याने फेटाळून लावले आहे. एका खाजगी वृत्तवाहीनीने हार्दीक आणि राहुल यांची भेट झाल्याचे वृत्त दाखवले होते. शिवाय राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये हार्दिक आल्याचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले होते. त्यानंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली होती.

हार्दीक पटेल यांना पाटीदार समाजाचा मोठा पाठींबा आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्या प्रत्येक हालचालांवर सरकार आणि भाजपच्या नेत्यांचे लक्ष आहे. हार्दिकचा पाठींबा मिळवण्यासाठी काँग्रेससह भाजपचे नेतेही प्रयत्नात आहेत. मात्र हार्दिक आणि त्याच्या सहकार्यांचा कल हा सध्या तरी काँग्रेसकडे असल्याचे स्पष्ट आहे. त्यातूनच राहुल आणि हार्दिकच्या भेटीचे वृत्त समोर आले आहे. शिवाय राहुल गांधी बरोबर हात मिळवणी करायची असेल तर ती सर्वां समोर करेन हे हार्दिक यांचे वक्तव्य सर्व काही सांगून जाते.

Related posts

बारामतीत आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह, सर्वत्र चिंतेंचे वातावरण

News Desk

शरद पवार

Aprna

‘कुणाचाही घर-संसार उघड्यावर येऊ देणार नाही’, धनंजय मुंडेंचं आश्वासन!

News Desk