HW News Marathi
मुंबई

व्हिसीला बडतर्फ केले मग व्हिटीला कधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई – मुंबई विद्यापिठात निकालांचा झालेला गोंधळाला विद्यापिठाते व्हाईस चांसलर म्हणजे व्हिसी डॉ. संजय देशमुख यांना जबाबदार धरत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. मात्र सर्व जबाबदारी व्हिसींवर टाकून त्यांना बडतर्फ करणे ही पळवाट आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. व्हिंसींना जर बडतर्फ केले जात असेल तर शिक्षण खाते सांभाळणारे शिक्षण मंत्री व्हिटी म्हणजेच विनोद तावडेंनाही बडतर्फ केले पाहीजे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. मलिक यांनी यावेळी तावडे यांची संभावना व्हि. टी. अशी केली. तावडे हे अकार्यक्षम मंत्री असल्याचा घणाघातही त्यांनी केला. बोगेस डिग्री घेणारा शिक्षण मंत्री बोगस काम करत आहे असा टोलाही त्यांनी तावडेंना लगावला.

मुंबई विद्यापिठाचे संपूर्ण जगात एक वेगळे स्थान आहे. पण या निकाल प्रकरणा वरून संपूर्ण जगात या विद्यापिठाची नाचक्की झाली आहे. त्याला देशमुख आणि तावडे हे दोघेही जबाबदार आहेत. देशमुख यांचा राजिनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने वारंवार केली होती. मात्र त्यांना अभय दिला जात होता. आता त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तशीच कारवाई आता मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांवर करावी असेही ते म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शक्ती मिल बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशी शिक्षा कायम | मुंबई उच्च न्यायालय

News Desk

आजपासून दादर, वसई रोड स्थानकातील पादचारी पूल ‘बंद’

News Desk

शेतकऱ्यांचा संताप, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर फेकला भाजीपाला

News Desk