HW News Marathi
मुंबई

विश्वास प्रस्तावावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ

मुंबई | विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधातील विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव दाखल होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विश्वास प्रस्ताव मांडून तो आवाजी मतदानाने मंजूर केल्याने सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला. विरोधकांनी मांडलेला प्रस्ताव दाखल करू दिला नाही म्हणून विरोधकांना जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी दाखल केलेला प्रस्ताव

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिशय आक्रमकपणे आपल्या विश्वास ठरावाचे समर्थन केले. हा ठराव नियमानुसारच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. नियमानुसार आम्हाला हा प्रस्ताव मांडला होता. २१.६.२००६ रोजी विलासराव देशमुख यांनी हा प्रस्ताव पारित केला होता. त्यावेळी जे कायदेशीर होते. ते आज कायदेशीर आहे. पुढच्या प्रस्ताववार आत्ता या ठिकाणी चर्चा होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आक्रमकपणे मत मांडले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भुलाबाई देसाई रोडवरील गाळ्यांना भीषण आग

News Desk

पुढच्या १ महिन्यात मुंबईतील १५७ पुलांचे ऑडिट सादर करा, महापालिकेचा आदेश

News Desk

व्यापाऱ्यांना फटाका विक्री परवान्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत

News Desk
मुंबई

विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाला मुख्यमंत्र्यांचे विश्वास ठरावाने उत्तर

News Desk

मुंबई | विधानसभा अध्यक्षांविरोधातील सरकारने मांडलेल्या विश्वास प्रस्तावावरून विधानसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ घातला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध १८ दिवसांपूर्वी विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला होता.

त्याला प्रत्यूत्तर म्हणून फडणवीस सरकारने विरोधकांच्या अविश्वास ठरावावर कोणतीही चर्चा न करता उलट सभागृहात ‘विश्वास’ ठराव मांडला. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूरही करून घेण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, इतर वेळी सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेनेही यावेळेला सरकारच्या विश्वास ठरावाला अनुमोदन दिले.

सरकारी पक्षाकडून अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव आम्ही सभागृहात ५ मार्च रोजी आणला होता. हा प्रस्ताव चर्चेला घ्यावा अशी आम्ही मागणी केली आहे. योग्य वेळी निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते. परंतु सरकारने तो अविश्वास ठराव चर्चेला न आणता ‘विश्वास’ ठराव मांडला, असे म्हणत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारच्या या खेळीला आपला आक्षेप नोंदवला.

याच मुद्यावरून विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘यापूर्वी सभागृहात असे प्रकार झालेले आहे. काँग्रेसच्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडला होता आणि तो मंजूर केला होता.

आजही नियमानुसार कामकाज झाले आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकत नाही’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपला ‘विश्वास’ ठराव रेटून धरला. यानंतर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची परस्पर विरोधी घोषणाबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Related posts

2014 पर्यंतच्या अनधिकृत झोपड्या अधिकृत करा!

News Desk

मुंबईतून 50 उड्डाणे रद्द

News Desk

नीरव मोदीला प्रियंका चोप्राने नोटीस बजावली

swarit