HW News Marathi
मुंबई

राणेंची जागा नक्की कुठे – रावसाहेब दानवे सांगतील का?

मुंबई सरकारविरोधात बोलाल तर लक्षात ठेवा…भूजबळांशेजारी अजून तीन रूम शिल्लक आहेत…अशी धमकी अजून कोणी नाही तर चक्क भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नारायण राणे यांना दिली होती. राणे त्यावेळी काँग्रेस मध्ये होते. शिवाय भाजप सरकार विरोधात आक्रमक ही होते. मात्र दानवेंच्या धमकी नंतर सर्व चक्र फिरली….राणेंचा भाजप विरोधातील आक्रमक पणा कमी झाला. त्यांच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू झाली. राणे शांत झाले. भाजप विरोधाची धार बोधट होवून राणे कॉंग्रेस विरोधात बोलू लागले.

भाजप मध्ये जाण्याचे व सत्तेचेही वेध लागले. जेल मध्ये टाकू अशी धमकी देणारे दानवे तर राणेंच्या गाठी भेटी दिल्लीत घडवून देण्यात पुढे होते. आता हेच दानवे आता राणेंना भूजबळांच्या सोबत पाठवणार की चक्क मुख्यमंत्र्यांच्या बाजूला कॅबिनेट मध्ये मांडीला मांडी लावून बसवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपची दुटप्पी भूमिका यातून स्पष्ट होत आहे. राणे उद्या भाजप मंत्रीमंडळात आले तर आश्चर्य नको.पण दानवे कोणत्या तोंडाने त्यांना मंत्री मंडळात घेतलं हे सांगणार आहेत का? राजकीय वर्तूळात सध्या हा प्रश्न अधिक चर्चिला जात आहे…याचं उत्तर दानवेंना द्याव लागेल. ज्या माणसाला जेलची हवा खाण्याची धमकी दिली तो माणूस आज एनडीए मध्ये कसा? असं काय झालं ज्यामुळे सर्व चक्र फिरली याचं उत्तर दानवे देतील का? ….

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिवसाढवळ्या त्याने पॅंटेची चैन खोलून दाखवली

News Desk

भूस्खलन होऊन नागपुरात कुटुंब जमिनीखाली दबले

News Desk

मराठा आरक्षणाचे काय झाले? न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

News Desk
महाराष्ट्र

महाराष्ट्रात फटाके बंदी झाल्यास कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार

News Desk

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत दिवाळीत फटाके विक्रीस बंदी घातली आहे. या निर्णय़ाचे अनेकांनी स्वागत केले तर काहींनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्रात देखील पर्यावरणाचा प्रश्न गंभीर असून दिवाळीत फटाके विक्रीस बंदी घालण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांना प्रस्तावर सादर केल्यांतर फटाकेबंदीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके बंदी लागु होऊ शकते. दरम्यान, असे झाल्यास फटाके कारखानदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Related posts

“महाविकास आघाडी सरकार बहुजनांचे सरकार,” पडळकरांची राऊतांवर टीका

Aprna

सोनिया गांधींकडून ‘महाशिवआघाडी’ला मिळाला हिरवा कंदील | सूत्र

News Desk

मी 5 वर्ष खातं सांभाळलंय, मला शिकवू नका, मराठा तरुणांच्या नियुक्तीचे आदेश काढा!

News Desk