HW News Marathi
मुंबई

तरुणीचा विनयभंग करून केली धक्काबुक्की -रिक्षाचालक ताब्यात

ठाणे कामावरून घरी निघालेल्या तरुणी अलोक हॉटेल्स जवळ रस्ता ओलांडताना मस्तवाल रिक्षाचालकाने तरुणीला डोळा मारला व तरुणीच्या आईच्या पायावर रिक्षा नेल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणीला धक्काबुकी करीत विनयभंग केल्याचा प्रकार बुधवारी रात्री स्टेशन परिसरात घडला. या प्रकरणी तरुणीने ठाणे नगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल केला. ठाणे नगर पोलिसांनी रिक्षाचालक सिकंदर शेख याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत अटक केली.

फिर्यादी तरुणी कामावरून घरी निघाली होती.तिच्या सोबत तिची आई होती. स्टेशन परिसरातून जात असताना रस्ता ओलांडत असताना रिक्षा चालक सिकंदर शेख(२७) रा. राबोडी, याने मुलीला डोळा मारला व रिक्षा मुलीच्या आईच्या पायावर नेली . या जाब रिक्षाचालकाला विचारला असता वाद झाला. रिक्षा चालक शेख याने तरुणीला काहीतरी अपशब्द वापरले व रिक्षाचालकाने तरुणीला धक्काबुक्की करून विनयभंग केला. तरुणीने व तिच्या आईने रिक्षाचालकाला चोप देऊन गस्तीवरील बीट मार्शल यांच्याकडे तक्रार केली. गस्तीवरच्या बिट मार्शल यांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी शेख याला ताब्यात घेतले. पोलिसांनी शेख याला ठाणे नगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणीचा जाबजबाब नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत नोंदविला . ठाण्यात महिन्याभरात तरुणीचा विनयभंग, रिक्षातून फेकण्याचा घटना घडल्याने रिक्षाचालकांचा मस्तवालपणा वाढत चालला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विसर्जन मिरवणुकी दरम्यान एकाचा मृत्यू

Gauri Tilekar

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी बालवाडीच्या हद्दपारीचा घाट

News Desk

उंदरासाठी १३० कोटीचं घर 

News Desk
देश / विदेश

पारंपरिक पौरहित्याला फाटा देत पुतळ्याला फेरे मारून केले लग्न

News Desk

भोपाळ- पारंपरिक विवाहपद्धतीला फाटा देत मध्य प्रदेशातील सिहोरमधील तरुण-तरुणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती फेरे घेऊन सत्यसोधन पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा आहे. पौराहित्य पद्धत हद्दपार करण्यासाठी नव्या पिढीने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊलं मानलं जात आहे.

मध्य प्रदेशमधील कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला

सात फे-या मारून लग्न केले. काही सामाजिक संघटना आणि पुरोगामी नागरिकांच्या मतदीने हे कार्य पार पडले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या जोडप्याने हे लग्न केल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी उचलले पाऊलं क्रांतीकारक असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या कार्यामुळे यापुढे पारंपरिक प्रचलित पौराहित्याची पद्धत हद्दपार होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related posts

#PulwamaAttack : ‘उरी’च्या कलाकारांनी देखील व्यक्त केला निषेध

News Desk

पासपोर्टसाठी जन्माच्या दाखल्याची गरज नाही

News Desk

डेनिस मुकवेगे, नादिया मुराद यांना नोबेल पुरस्कार

swarit