HW News Marathi
मुंबई

दूषित पाण्यामुळे नवापुर दांडी खाडीतील अनेक मासे मृत्युमुखी

नागनाथ बाबर

पालघर जिल्ह्यातील तारापुर एम् आय डी सी मधून तीव्र रासायनिक सांडपाणी दांडी – नवापूर खाडीत सोडल्यामुळे खाडीपात्रातील मासे मोठ्या प्रमाणात मरून तरंगत असताना आढळून आले.

गेल्या कित्येक वर्षापासून एम् आय डी सी तारापूरच्या गैरपध्दती बाबत शासन दरबारी, महाराष्ट्र नियंत्रण मंडळ तारापूर व त्यांच्या उच्च स्तरीय अधिका-यांना वारंवार स्थानिकानी लेखी व तोंडी तक्रार देऊन ही परिस्थितीवर नियंत्रण आले तर नाही, उलट दिवसेंदिवस येथील परिस्थिती गंभीर होत आहे.

पालघर तालुक्यातील औद्योगिकरण वाढत असताना त्यापासून होणा-या प्रदुषणावर दुर्लक्ष झाल्यामुळे येथील मासेमारी उध्वस्त होऊन, मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रासायनिक सांडपाण्यापासून होणा-या प्रदूषणामुळे अनेक जण दुर्धर आजारांना बळी पड़त आहेत.

या बाबत मच्छीमार संघटनानी हरित लवादाकड़े याचिका दाखल करुन जाब विचारला त्या वेळी हरित लवादाने जे कारखाने नियमाचे पालन करीत नसल्याने तपासात दिसून आले अशा सुमारे 40 कारखान्याना बंद करण्याचे आदेश दिले होते, मात्र या नंतर देखील दुर्लक्ष करीत कारखानदार बेधड़क तीव्र रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाल्यात सोडत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच या बाबत प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कारखांदाराचीच बाजू घेत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत , असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल

News Desk

परळ बसस्थानकात एसटीचा ७० वा वर्धापनदिन साजरा

News Desk

पश्चिम बंगाल सरकारच्या हुकूमशाही विरोधात अभाविपचे भांडुप येथे आंदोलन

News Desk