HW News Marathi
मुंबई

मुंबई पोलिसांसाठी ऑन ड्यूटी ८ तास

मुंबई – पोलिसांचे काम म्हटले की, ऑन ड्यूटी २४ तास ही जणू म्हणच झाली होती. पण, आता इथून पुढे पोलिसांसाठी ‘ऑन ड्यूटी ८ तास’ म्हटले जाणार आहे. कारण मुंबई पोलिसांसाठी ‘मिशन ८ अवर्स’ या कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी घोषणा केली.

पोलीस घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परत येण्याची वेळ निश्चित नव्हती. पोलीस कधी १२ तास, १६ तास तर कधी २४ तास ड्यूटी करतात. पोलिसांच्या आरोग्य, कौटुंबिक आणि मानसिक ताण निर्माण होत होता. कामाच्या तणावामुळे काही पोलिसांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत.

मिशन ८ अवर्स

गेली वर्षभर मुंबईच्या देवनार पोलीस स्टेशनमध्ये ऑन ड्यूटी ८ तास संकल्पना राबवण्यात आली. त्यानंतर मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमधील पोलिसांची संख्या लक्षात घेऊन ही संकल्पना सर्व पोलीस स्टेशनमध्ये राबली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

News Desk

दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना ‘आयडॉल’चा दिलासा

News Desk

मोबाइल सावरताना आईने चिमुरडीला दहाव्या मजल्यावरून पाडले

News Desk
महाराष्ट्र

केंद्र सरकारकडून हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रद्द

swarit

नवी दिल्ली – दरवर्षी केंद्र सरकारकडून हज यात्रेसाठी ७०० कोटींचे अनुदान देण्यात येत होते. पण, सरकारने हे अनुदान रद्द करुन महिलांच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्की यांनी सांगितले.

‘भारताकडून १ लाख ७५ हजार भाविक यावर्षी हज यात्रेसाठी जाणार असल्याची माहिती नक्की यांनी दिली. याचा फायदा मुसलमानां होत नसून दलालांना होत असल्यामुळे अनुदान बंद करण्याच निर्णय सरकारने घेतला असून गरीब मुस्लीम हज यात्रींसाठी लवकर वेगळी सोय केली जाणार असल्याचे देखील यावेळी मुख्तार अब्बास नक्कीनी सांगितले.’

मोदी सरकार ही अल्पसंख्याक लोकांना फसवणूक करत असून या सरकारकडून कोणतीच अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता नवाब मालिक यांनी म्हटले. तसेच सरकारने २०१३ साली ६८० कोटी, २०१४ साली ५७७ कोटी, २०१५ साली ५२९ कोटी आणि २०१६ साली ४०५ कोटीचे अनुदान हज यात्रेसाठी दिले होते.

Related posts

“राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत” अजित पवार

News Desk

महावसुली आघाडी सरकारच्या काळातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण चिंताजनक 

News Desk

“मी मास्क घालतच नाही…!” – राज ठाकरे

News Desk