HW News Marathi
महाराष्ट्र

महावसुली आघाडी सरकारच्या काळातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण चिंताजनक 

मुंबई | राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार हे महावसुली आघाडी सरकार असून सध्या राज्यातील राजकारणाचे होणारे गुन्हेगारीकरण ही अतिशय चिंतेची बाब आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (२४ मार्च) ठाणे येथे केली. आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था लिंबूटिंबू खेळाडूसारखी झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ज्यांचं राजकारण सुरू होत नाही अशा लोकांच्या राज्यातच महिलांवर अत्याचार आणि खंडणी यासारखे गुन्हे घडत आहेत. महावसुली आघाडी सरकारच्या जोखडातून महाराष्ट्राला वाचविण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रातील जनता भीतीच्या छायेखाली असून लोक आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. खंडणी घेणाऱ्या सरकारला समर्पण निधीचे महत्व काय कळणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमुळे ३ महिन्यांचे लाईटबिल शासनाने माफ करावे

News Desk

खरिपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण, वरूनराजा बरसण्याची प्रतीक्षा दादा भुसेंची माहिती!

News Desk

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द,निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही – अजित पवार

News Desk