HW News Marathi
मुंबई

‘मरे’वर रुळाला तडा

मुंबई – रोज ‘मरे’साठी प्रसिद्ध असलेली मध्य रेल्वे आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी पुन्हा कोलमडली. आज निमित्त होतं ते, दिवा स्थानकात रुळाला तडा गेल्याचं. या गोंधळामुळे मुंबईकडे येणाऱ्या धीम्या गाड्या तब्बल ते अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.

दरम्यान, रेल्वे रुळ काही वेळातच दुरुस्त करण्यात आला. मात्र या काळात मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला आहे. सकाळची वेळ असल्याने कामावर वेळेत पोहणचण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना विनाकारण स्थानकावर ताटकाळत राहावं लागत आहे.

दिवा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेला होता. यानंतर धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली होती. रुळ दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे, मात्र यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू होत्या. परिणामत:दिवा, मुंब्रा, कळवा स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता पश्चिम रेल्वेच्या महिला डब्ब्यावर दिसणाऱ्या ‘स्त्री’चा लोगो बदलला

News Desk

साध्या वेषात मोहीम फत्ते !

News Desk

Dongri Building Collapsed : ‘बी’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त निलंबित

News Desk