HW News Marathi
मुंबई

युती तुटल्यास शिवसेनेला ‘दे धक्का’साठी भाजपाची रणनीती

मुंबई – शिवसेनेशी युतीबाबत प्रयत्न, चर्चा सुरू असली तरी भाजपाकडून पर्यायी रणनीतीही तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतील २२७ जागांसाठी ५१३ उमेदवारांची यादी तयारही करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या भाजपा निवडणूक समिती बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते.

मुंबईतील २२७ वॉर्डांमधून उमेदवारीसाठी भाजपाकडे तब्बल २५०० इच्छुकांनी अर्ज केले होते. यापैकी ५१३ जणांची ही यादी निवडणूक समितीने केली आहे. आता ही यादी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखालील या निवडणुक समितीत २९ सदस्य आहेत. या समितीने सलग तीन दिवस २० तास मॅरेथॉन चर्चा केल्यानंतर या यादीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. आता शेलार या ५१३ जणांतून अंतिम उमेदवार निवडून ही नावे मुख्यमंत्र्यांपुढे सादर करतील. भाजपच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे प्रत्येक वॉर्डात दोन ते तीन तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना-भाजप युतीसाठीच्या चर्चेच्या पहिल्या काही फेऱ्यांनंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या बेताल वक्तव्याच्या मुद्द्यामुळे ही चर्चा फिस्कटली होती. शिवसेनेला सोमय्या व शेलार यांच्या वक्तव्यांवर आक्षेप असून भाजपला अनिल परब व खासदार संजय राऊत यांच्या टीकाटिप्पणीबद्दल राग आहे. भाजप नेत्यांच्या आरोपांच्या फैरी सुरु असेपर्यंत युतीची चर्चा सुरु न करण्याचा आणि नोटाबंदीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडत राहण्याचे शिवसेनेने ठरविले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील चर्चेनंतरच तिढा सुटण्याची शक्यता आहे. मात्र, काहीवेळापूर्वीच दोन्ही पक्षांकडून चर्चेसाठी पुन्हा तयारी दर्शविण्यात आली आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी एकमेकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर युतीची चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नाणार प्रकल्पावर उद्धव मुख्यमंत्र्यात गुफ्तगु

swarit

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोळीवाड्यात कच-याचे साम्राज्य

News Desk

#26/11Attack : अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याची माहिती देणाऱ्याला ३५ कोटींचे बक्षीस

News Desk
महाराष्ट्र

दारू विक्री आणि बँकेच्या ट्रांजेक्शनवर आयकर विभागाचे लक्ष

News Desk

निवडणूक निर्भय पणे पार पडण्यासाठी दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि निवडणुकी दरम्यान बँकेत होणारे आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्यात येणार….. आयुक्त

उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक जास्तीत – जास्त मतदान व्हावे यासाठी जन -जागृती करणार असून चांगले मतदान होईल अशी अपेक्षा असल्याचे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, हि निवडणूक निर्भय पणे पार पडण्यासाठी दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि निवडणुकी दरम्यान बँकेत होणारे आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्यात येणार असल्याचं सुद्धा आयुक्तांनी पत्रकार परिषदेत म्हटलं

उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या उपाय -योजना व नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पत्रकारांना दिली . निंबाळकर म्हणाले कि २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत फक्त ४२ टक्के मतदान झाले होते . त्यापूर्वी देखील मतदानाचा आकडा फारसा चांगला नव्हता . ही बाब लक्षात घेऊन यंदा ७० ते ७४ टक्क्यांपर्यंत व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत . यंदा १ लाख ५० हजार मतदार मतदान यादीतून वगळले असले तरी मतदानाची आकडेवाडी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे . तसेच हि निवडणूक निर्भय पणे पार पडण्यासाठी दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि शहरात प्रवेश होणाऱ्या रस्त्यावर बारकाईने लक्ष दिले जाणार असल्याचं आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी म्हटलंय

https://youtu.be/JHbRS6CXSiI

राजेंद्र निंबाळकर आयुक्त

याशिवाय निवडणुकी दरम्यान बँकेत होणारे आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्यात येणार असून यासाठी आयकर विभागाचे पाच विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती निंबाळकर यांनी यावेळी दिली.

सोशल मीडियावर देखील आम्ही जातीने लक्ष देणार आहोत , सोशल मीडियावर निवडणुकीसंबंधी माहिती देतांना महानगरपालिका प्रशासन व निवडणूक आयोगाची संमती घेणे आवश्यक आहे . तसे न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी माहिती दिली .

Related posts

खडसेंना पुन्हा कोरोनाची लक्षणे, ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाणार?

News Desk

‘माझ्या कुटुंबीयांचं काश्मीरशी नातं’ काँग्रेस नेते राहुल गांधीचं वक्तव्य!

News Desk

मुंबईसह राज्यात कट कारस्थाने शिजत असताना महाराष्ट्र एटीएस झोपलंय का? आशिष शेलारांचा सवाल!

News Desk