HW News Marathi
देश / विदेश

आता बारपासून 500 मीटरपर्यंत रस्ता बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी

नवी दिल्ली – यापुढे महामार्गावरील बारपासून 500 मीटरपर्यंत रस्ता बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसा सुधारित निकाल न्यायालयाने दिला आहे.

महामार्गापासून 500 मीटर अंतरावर न्यायालयाने दारूविक्रीस बंदी घातली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय अपघातग्रस्त नातेवाईक संघटनेने प्रतियाचिका सादर केली व लांब लांबून येणारे मद्यपी वाहने वाकडी वाट करून 500 मीटर आत गाडी नेतील आणि दारू पिणारच व अपेक्षित परिणाम साधला जाणार नाही अशी भीती व्यक्त केली. या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सुधारीत निकाल दिला असून, महामार्गापासून 500 मीटर लांब मद्यविक्रीस परवानगी देताना, या जागेच्या चारही बाजुंना कुठल्याही प्रकारचा रस्ता असू नये अशी अट टाकली आहे.

ज्या जागेपर्यंत जाण्यासाठी 500 मीटर अंतर चालतच जावे लागेल अशा ठिकाणीच बार उघडता येईल अशी अट न्यायालयाने घातली आहे. यामुळे बहुतांश मद्यपींची इच्छा मरेल आणि त्यातही जे जातील ते परत चालत येताना शुद्धीवर येतील असा यामागचा आडाखा आहे. त्यातही ज्या जागा उंचसखल आहेत, आजुबाजुला प्रचंड खड्डे आहेत, डंपिंग ग्राउंड आदी आहे अशा ठिकाणी बार उघडण्यास अग्रक्रमाने परवानगी द्यावी असा आदेशही न्यायालयाने सरकारला दिला आहे. सरतेशेवटी एकदा अशा जागी बारला परवानगी दिली की त्यानंतर बारचे अस्तित्व असेपर्यंत त्याच्या चारही बाजुंना 500 मीटर अंतरापर्यंत रस्ता बांधता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवार जरा तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा !, पडळकरांची टीका

News Desk

जाणून घ्या… गुरूपौर्णिमेचे महत्व

News Desk

एटीएसमुळं कर्करोग झाला – साध्वी प्रज्ञासिंह

News Desk