HW News Marathi
देश / विदेश

एप्रिलमध्ये मोदी- शरीफ यांच्यात होऊ शकते चर्चा ?

नवी दिल्ली- उरी हल्ल्यानंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा होऊ शकते. एप्रिल महिन्यात इंडियन कोस्ट गार्ड आणि पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सीच्या बैठकीसाठी भारताने तयारी दाखवल्याची माहीती मिळतेय.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात दोन्ही देशात याविषयी चर्चा झाली होती. यापुर्वी 2005 मध्ये इंडियन कोस्ट गार्ड आणि पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सीमध्ये झालेल्या एका करारानुसार दोन्ही देश बेकायदेशीर जहाजे, महासागर प्रदूषण तसेच नैसर्गिक संकटाबाबत माहिती देतील असे ठरले होते. मागच्या वर्षी म्हणजेच 2016 मध्ये हा करार 5 वर्षांनी वाढवण्यात आला होता. तसेच यावर्षी जून महिन्यात शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन होणार आहे. या पार्श्वभूवमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट होण्याचीही दाट शक्यता आहे. मागच्या आठवड्यात नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या. पत्रामध्ये पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे असा ऊल्लेख त्यांनी केला होता. यासर्वांवरुन हेच लक्षात येत आहे की यावेळी नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद आणि उरी हल्ला अशा विषयांवरही चर्चा होऊ शकते. तसेच मैत्रीपुर्व विषयावरही यावेळी काही बोलणं होऊ शकेल याबाबत दाट शक्याता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमेरिकेतील एच-४ व्हिसाधारकांना मोठा धक्का

swarit

लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे – प्रकाश जावडेकर

News Desk

अमेरिका आर्थिक संकटात

swarit
क्राइम

पालघर- युवकाची  लोकल खाली आत्महत्या

News Desk

नागनाथ बाबर

पालघर जिल्ह्यातील बोइसर येथील युवकाने लोकल खाली येऊन आत्महत्य केल्याची घटना समोर आली आहे

बोइसर येथील धनानी नगर मध्ये राहणाऱ्या परमेश्वर बागल नावाच्या युवकाने उमरोळी रेलवे स्टेशन जवळ संध्याकाळी साडेचार ते पाच वाजता च्या दरम्यान मुंबई कडून डाहनुकड़े जाणाऱ्या लोकल खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसून रेल्वे पोलिस तापस करीत आहेत

Related posts

आमदार नितेश राणे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

News Desk

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

News Desk

पैसे देण्यास नकार दिल्याने तिचे स्तनच कापले

News Desk