HW News Marathi
देश / विदेश

कर्नल पुरोहितला सशर्त जामीन

नवी दिल्ली : मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारीसशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे पुरोहित तब्बल नऊ वर्षानंतर तुरूंगाबाहेर येणार आहे. यापूर्वी त्याने विविध न्यायालयांत केलेले जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयानेही पुरोहितच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला होता. पुरोहित यांच्या जामिनासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने मात्र जामिनाला विरोध केला होता. पुरोहित यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवावा, असे एनआयएचे म्हणणे होते. मात्र मालेगाव प्रकरणात आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरला जामिन मिळतो मग पुरोहितला का नाही, असा सवाल अड. साळवे यांनी उपस्थित केला होता. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अखेर पुरोहितला अखेर जामीन मंजूर केला.

पुरोहितवर थेट आरोप सिद्ध झालेले नाहीत. आरोप सिद्ध झाले, तरी याप्रकरणात त्याला केवळ ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र पुरोहितने ९ वर्ष कारावास भोगल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याचंसूत्रांनी सांगितलं.

मालेगाव बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्‍स उपलब्ध करून दिल्याच्या आणि या बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोपाखाली कर्नल पुरोहितला एटीएसने नोव्हेंबर २००८ मध्ये अटक केली होती. तेव्हापासून तोतुरूंगात होता. दरम्यान, सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या स्फोटात सहा जण ठार तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिका युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नाही, पण…! – जो बायडेन

Aprna

EVM हॅकिंगची कल्पना असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन हॅकरचा धक्कादायक खुलासा

News Desk

देशातील विरोधी पक्षांची सरकारे आता फार टिकणार नाहीत !

News Desk