HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये तीन अतिरेक्यांना कंठस्नान

श्रीनगर – काश्मीरमधील अतिरेकी कारवाया अद्याप कमी झालेल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वीच लष्कराच्या कारवाईत अतिरेक्यांच्या एका म्होरक्याला ठार करण्यात यश आलेले असतानाच, शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाचे आणखी तीन दहशतवादी आढळले. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करीत या तिघांनाही कंठस्नान घातले आहे.

सोपोर जिल्ह्यातील अमरगड येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात लष्कर-ए-तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून तीन एके-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच या चकमकीत एक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरू आहे. तसेच दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर काश्मीर खो-यात हिंसाचार उफाळू येऊ नये, म्हणून बारामुल्ला परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, शुक्रवारी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी मारला गेला. स्थानिक पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देशात ‘कोरोना’च्या रुग्णांची संख्या २९ वर,आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिले निवदेन

swarit

सरकारने शेतकऱ्यांविरोधात ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले, संजय राऊतांचा केंद्रावर हल्ला

News Desk

आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे म्युझियम “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे ओळखले जाणार

News Desk
महाराष्ट्र

फळभाज्यांचे भाव गगनाला

News Desk

नाशिक : काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आवक घटली आहे. त्याच वेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरातमध्ये मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. परिणामत; किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहे.

नाशिक बाजारसमितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रूपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रूपये, दोडका ४० रूपये, भोपळा ३० रूपये नग, हिरवे वांगी ३५ रूपये, लाल वांगी ४० रूपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.

पावसाने सध्या उघडीप दिलेली असली, तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजीत आहे. मात्र आगामी काही दिवसात सर्वच फळभाज्या मोठया प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत किमान ४० रुपये प्रतिकिलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८०रुपये प्रतिकिलो दराने खरेदी कराव्या लागत आहेत

Related posts

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मध्य प्रदेशात पंकजा मुंडेंच्या मॅरेथॉन सभा

News Desk

“…तर ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा”,राऊतांचा कंगनाला टोला!

News Desk

नाविन्यपूर्ण रीतीने व कालानुरूप सकारात्मक बदल करून राबवत गरजूंना लाभ देण्याचे नियोजन – धनंजय मुंडे

Aprna