HW News Marathi
देश / विदेश

देशात ‘कोरोना’च्या रुग्णांची संख्या २९ वर,आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिले निवदेन

नवी दिल्ली | देशात कोरोना विषाणूची लागण झालेले २९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी तिघेजण (केरळमधले) बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आज (५ मार्च) संसदेच्या दोन्ही सभागृहात निवदेन दिले आहे.

देशातल्या काल (४ मार्च) बहुतांश विमानतळांवर सार्वत्रिक तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी आज राज्यांमधून अतिरिक्त कर्मचारी पाठवण्यात येणार आहेत. अन्य देशातून येणाऱ्या प्रवाशांबरोबरच देशातही संसर्गाद्वारे कोरोनाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पंचायत समिती स्तरावर जलद प्रतिसाद दलाची स्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्यांना यात सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोविड-१९ रोगाच्या व्यवस्थापनासाठी खासगी क्षेत्रालाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री आज संध्याकाळी बैठक घेणार आहेत. एकूण ३ हजार ५४२ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी २९ नमुने कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. ९२ नमुन्यांची तपासणी सुरु असून २३ नमुन्यांची फेरतपासणी केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पश्चिम बंगालमध्ये कोरोना स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता’, ममता बॅनर्जींची पंतप्रधानांना पत्रातून माहिती

News Desk

‘जैश’चा म्होरक्या अझहरला दहशतवादी घोषित करा, अमेरिका, फ्रान्ससह ब्रिटन संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव 

News Desk

सुप्रिया सुळे ७ व्यांदा ‘संसद रत्न’ने सन्मानित होणार

Aprna