HW News Marathi
देश / विदेश

गोपाल कृष्ण गांधी उपराष्ट्रपदासाठी विरोधकांचे उमेदवार

नवी दिल्ली पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपालकृष्ण गांधी हे उपराष्ट्रपदासाठी विरोधकांचे उमेदवार राहणार आहेत सोनिया गांधी यांनी 18विरोधपक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. या वृत्ताला गांधी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती निवडणुकासंदर्भात देशभरातील अठरा विरोध पक्षाच्या नेत्यांची नवी दिल्लीत मंगळवारी बैठक झाली. यावेळी जेडीयू नेता शरद यादव या बैठकीला उपस्थित होते. एकीकडे याच पक्षाचे नितीश कुमार यांना भाजपचे उमेदावर कोविंद यांना पाठिंबा देण्याची तयारी चालवली आहे. दुसरीकडे शरद यादव विरोधी गोटात गेल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. जेडीयूने आपली भूमिका बदलल्या या निवडणुकीचे चित्र वेगळे राहण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. या नेत्यांच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाचा आढावा घेण्यात आला. लालू प्रसाद यादव व त्याच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या यंत्रणाद्वारे लक्ष्य केले जात असून त्याचा विरोध अधिवेशनात करण्याची रणनीती या बैठकीत आखण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

BiharElection: तेजस्वी यादव यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुसंडी मारली  

News Desk

कमी गुण मिळाल्याने वर्गात विद्यार्थीनींचे कपडे काढले

News Desk

दावोस येथील परिषदेत ब्रिटीश कंपनीशी सकारात्मक चर्चा

Adil
महाराष्ट्र

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाघाला दत्तक घेतले

News Desk

ठाकरे कुटुंबाचा टायगर तर आमचा पँथर – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे नेतृत्व भारतीय दलित पँथर या आक्रमक संघटनेतून उदयास आल्याने पँथर संघटनेवर त्यांचे अतूट प्रेम राहिले आहे त्यामुळे आज वन्य जीव दिनानिमित्त पँथर अर्थात बिबट्या वाघाला दत्तक घेतले

एका पँथर ने पँथर ला दत्तक घेण्याचा सोहळा पहण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्राणी प्रेमी आणि पँथर प्रेमींनी मोठी गर्दी केली होती . ठाकरे कुटुंबाने सुद्धा यापूर्वीच टायगर दत्तक घेतला आहे त्याप्रमाणे आठवले कुटुंबाने पँथर दत्तक घेतला आहे

शिवसेनेचा टायगर आणि आरपीआय चा पँथर राजकीय जंगलात एकत्र आल्यावर संपूर्ण जंगलवर राज्यस्थापन करू शकतो याची प्रचिती शिवशक्ति भीमशक्ति च्या महायुतीतून मागे आम्ही दाखवून दिले आहे असे प्रतिपादन रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले .

ना रामदास आठवले यांचे सुपुत्र कु जीत आठवले यांच्या पुढाकारातून हा बिबट्या अर्थात पँथर दत्तक घेण्यात आला . या पँथर चे नाव ” भीम ” असे ठेवण्यात आले आहे . या पँथर च्या वर्ष भराचा देखभाल खर्च 1लाख 20हजाराचा धनादेश दहिसर तालुका रिपाइं तर्फे देण्यात आला आहे .

तथागत बुद्धांनी मनवाने मानवावर प्रेम केले पाहिजे तसेच प्राणिमात्रांवरही प्रेम केले पाहिजे असा उपदेश केला आहे त्यानुसार बिबट्या अर्थात पँथर दत्तक घेण्यात येणार आहे हा पँथर शहापुर येथे एका नदित जख्मी अवस्थेत सापडला होता त्याची देखभाल आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होत आहे असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले .

पूर्वी शिवसेनेच्या टायगर चे आणि दलित पँथर चे जमत नव्हते मोठा संघर्ष होत होता आता मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठाकरे कुटुंबाने घेतलेला टायगर आणि आम्ही घेतलेला पँथर एकत्र राहतील असेही ना आठवले म्हणाले . यावेळी सौ सीमाताई आठवले आणि कु जीत आठवले उपस्थित होते .

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती निमित्त अन्य कार्यक्रम करणे टाळून दहिसर रिपाइं तालुका अध्यक्ष दिलीप वाव्हले यांनी वन्यजीव दिनानिमित्त हा उपक्रम राबविला .

Related posts

महाविकासआघाडी सरकार कसं आणि कधी पडणार हे अजित पवारांना माहिती आहे,चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट!

News Desk

भाजपच्या दुसऱ्या यादीत ‘या’ दिग्गज नेत्यांची नावे नाही

News Desk

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!, भाजपचा टोला

News Desk