HW News Marathi
देश / विदेश

गोरक्षेच्या नावाखाली हिंसा अमान्य-संघ

वृत्तसंस्थाः देशात गौरक्षणाच्या नावावर होत असलेली हिंसा समर्थनीय नसल्याचे, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने (आरएसएस) स्पष्ट केले आहे. जे लोक गौरक्षणाच्या नावावर हिंसा करत आहेत. अशांविरोधात सरकारने कारवाई करावी, अशी मागणी संघाचे अखिल भारतीय प्रचारक प्रमुख मनमोहन वैद्य यांनी केली आहे. गौरक्षणाच्या नावावर होणाऱ्या हिंसेचा संबंध संघाबरोबर जोडण्याऐवजी अशांवर कारवाई केली जावी आणि दोषी ठरल्यास त्यांना शिक्षा सुनावण्यात यावी, असे वैद्य यांनी म्हटले.

गौरक्षा हा वेगळा मुद्दा आहे. शेकडो वर्षांपासून गौरक्षणाचे काम केले जात आहे. अशाप्रकारची घटना पहिल्यांदा झालेली नाही. अनेक वर्षांपासून असे प्रकार होत आहेत. माध्यमांकडून अशा घटनांना एका विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षही याचा राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत असून हे चुकीचे आहे, असे वैद्य म्हणाले.

संघाने हिंसेचे कधीच समर्थन केलेले नाही. याचे राजकारण करणे आणि समाजातील एका घटकाबरोबर चुकीची वर्तणूक करणे योग्य नाही. जम्मू येथे संघाच्या तीन दिवस संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. संघ प्रमुख मोहन भागवत, ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी, दत्तात्रेय होसबोले आणि कृष्ण गोपाल हेही या संमेलनात सहभागी झाले होते. या संमेलनाची शुक्रवारी सांगता झाली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीएसएफचे दहा जवान बेपत्ता

News Desk

कपिल शर्मा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

News Desk

राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला निवडणूक

News Desk