HW News Marathi
देश / विदेश

जीएसटीचा सर्वसामन्यांना भूर्दंड, ग्राहकांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली( वृत्तसंस्था)- एक देश एक कर प्रणालीचे तत्व घेऊन देशाने 1 जुलैपासून जीएसटी या नव्या करप्रणालीचा स्वीकार केला. आज एका महिन्यानंतर जीएसटी म्हणजे नेमके काय आहे, हे अद्याप अनेकांना उमगलेले नाही. छोटे-मोठे व्यावसायिक याबाबत अद्याप संभ्रमात आहेत. मोठे व्यावसायिक छोट्यांवर अन्याय करत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. काहींनी जीएसटी क्रमांक न घेताच आपले व्यावसाय सुरू ठेवले आहेत. नव्या वस्तू खरेदी न करता जुन्या वस्तू खपवण्याचा धंदा सुरू ठेवला आहे.

जीएसटीमुळे देशात मोठी क्रांती झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात सर्वसामान्यांना मोठ्या महागाईचा सामना करावा लागत आहे. साध्या हॉटेलमध्ये 60 रुपयांना मिळणारी राइसप्लेट आता सत्तर रुपयांना दिली जाते. बिलामध्ये राज्यसरकार व केंद्र सरकारचा कर आकारला जात आहे. त्यामुळे एक कर एक प्रणालीचा अर्थ उरत नाही. तरी जीएसटीच्या नावाने ढोल वाजवणे सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांचा संभ्रम वाढला आहे. यातून नेमका कुणाला फायदा झाला, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मोठ्या व्यावसायिक, उद्योजक आणि किरकोळ व्यापारी जीएसटीची वसुली ग्राहकांच्याच खिशातून करत आहे, त्यामुळ सर्वसामन्यांना जीएसटीतून काहीच मिळाले नाही, उलट महागाई वाढून ठेवल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युद्धासाठी सज्ज राहा, चीनच्या सैन्याला आदेश

News Desk

जाती धर्म भेद विसरून छत्रपती शिवरायांचे मावळे व्हा | रामदास आठवले

News Desk

Ayodhya Verdict : ५ सदस्यीय खंडपीठात ३ मराठी न्यायाधीशांचा समावेश

News Desk