HW News Marathi
देश / विदेश

तुतीय पंथीयांना मानवी  हक्क मिळवून देण्यासाठी संसदेत कायदा करणार – केंद्रियराज्यमंत्री  रामदास आठवले

हैद्राबाद तृतीयपंथी किन्नर हे मॅन किंवा वुमन नसले तरी ह्युमन आहेत.समाजात किन्नरांनासन्मानाने जीवन जगण्यासाठी त्यांना मानवी हक्क

मिळवून देण्यासाठी संसदेत कायदा करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. हैद्राबाद येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सभागृहात दोन दिवसीय राष्ट्रीय किन्नर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. देशभरात किन्नरांची6 लाखांपेक्षा अधिक संख्या आहे. त्यांना समाजात अपमानाची वागणूक मिळते .शिक्षण रोजगरविना त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावेलागते. तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडविण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्रमोदी हे गांभीर्याने विचार करीत आहेत . त्यामुळे लवकरच तृतीयपंथयांचे प्रश्नसोडविण्यासाठी त्यांनामानवतेचे हक्क मिळवून देण्यासाठी संसदेत कायदा करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले .

या संमेलनास देशभरातून हजारो किन्नर उपस्थित होते .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इस्रोची अंतराळ भरारी ! भारतासह ८ देशांच्या ३० उपग्रहांचे महाउड्डाण

News Desk

Budget 2022: येत्या ३ वर्षांत ४०० नवीन वंदे भारत ट्रेन धावणार! अर्थमंत्र्यांची घोषणा

News Desk

मुंबईची लाईफलाईन सुरु करावी, भाजप खासदारांची संसदेत मागणी! 

News Desk
महाराष्ट्र

पांडुरंग फुंडकर दांडी मारण्यात अव्वल

News Desk

मुंबई: राज्य मंत्रीमंडळ बैठकीत सतत दांड्या मारण्यात कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अव्वल ठरले आहेत. त्यांच्यापोठपाठ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर-पाटील, राजकुमार बडोले यांचा क्रमांक लागतो. माहिती अधिकारांतर्गत सचिवालयाने ही माहिती जारी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठकी आणि मंत्र्याची उपस्थितीची माहिती मागितली होती. मुख्य सचिव कार्यालयाचे अवर सचिव आणि जन माहिती अधिकारी केळकर यांनी ही माहिती दिली आहे. 17 जुलै 2016 पासून 22 मे 2017 या कालावधीत एकूण 35 मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता 22 च्या 22 मंत्र्यानी दांडी मारली. या दांडी बहादुरीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अव्वल क्रमांक पटवित 35 पैकी 11 वेळा अनुपस्थित होते. त्यानंतर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही 9 वेळा अनुपस्थित राहत दुसरा क्रमांक पटकविला. यानंतर ग्रामीण आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा क्रमांक लागतो.

Related posts

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कृतीची गरज

swarit

‘शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात’, किशोरी पेडणेकरांचे राणेंवर टीकास्त्र!

News Desk

नांदुरा तालुक्यात अवैध वृक्षांची कत्तल; वनविभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Aprna