HW News Marathi
देश / विदेश

तापमान बदलल्याने कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ

बोस्टन (वृत्तसंस्था) गेल्या १५ वर्षांमध्ये भारतातील पावसाचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मध्य आणि उत्तर भारतात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने (एमआयटी) केलेल्या अभ्यासात निदर्शनास आली आहे.

भारतातील पावसाचे प्रमाण वाढण्यामागे येथील जमीन आणि समुद्रावरील तापमानात अदलाबदल झाल्याचे प्रमुख कारण असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. ‘नेचर क्लायमेट चेंज’ या जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, सन १९५० ते २००२ या कालावधीत मध्य व उत्तर भारतात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण दर वर्षी कमीकमी होत गेले. हे प्रमाण प्रत‌िदशक ०.१८ मिमी इतके होते. २००२नंतर मात्र विपरित परिणाम दिसू लागला. २००२पासून भारतीय उपखंडातील तापमान वाढत गेले. हे प्रमाण प्रत‌िवर्ष ०.१ ते १ अंश से. इतके होते. त्याच वेळी समुद्रावरील तापमानात मात्र घट होत गेली. या परस्परविरोधी वातावरणामुळे भारतातील विशेषत: मध्य व उत्तर भारतातील पावसाचे प्रमाण वाढत गेले आणि गरजेपेक्षा जास्त पाऊस या भागांमध्ये पडू लागला, असे ‘एमआयटी’चे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ शिएन वांग यांनी नमूद केले आहे. या पावसामुळे अनेकदा या भागात पूरस्थितीमुळे संपूर्ण परिसर जलमय होत असल्याचे आढळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोना काळात नर्स डॉक्टरच्या रुपात देव आला होता”, लोकसभेत मोदींचे वक्तव्य

News Desk

सर्वोच्च न्यायालयानं खुल्या गुणवंतांना न्याय दिला – अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते

News Desk

Republic Day | हे आहेत गेल्या काही वर्षांतील सुरेख चित्ररथ

News Desk