HW News Marathi
देश / विदेश

तर अ‍ॅम्बी व्हलीचा लिलाव करू

नवी दिल्ली: १५ जुलैपर्यंत ५०० कोटी रुपये भरण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना दिले आहेत. पैसे भरण्यात अपयश आल्यास अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात करू, अशी तंबीच कोटार्ने रॉय यांना दिली आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे परत न दिल्याप्रकरणी सुब्रतो रॉय यांच्या अडचणीत आले होते. गुंतवणूकदारांकडून उभारण्यात आलेल्या तब्बल २५,००० कोटींच्या रकमेची परतफेड सुब्रतो रॉय यांना करायची आहे. या प्रकरणात बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुब्रतो रॉय यांनी १,५०० कोटी रुपये जमा केले. सुप्रीम कोटार्ने रॉय यांना १५ जुलैपर्यंत आणखी ५०० कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. ५०० कोटी रुपये भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती रॉय यांनी केली होती. मात्र कोटार्ने ही विनंती फेटाळून लावली. पैसे भरले नाही तर अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात करु असे कोटार्ने म्हटले आहे. यावर सुब्रतो रॉय यांनी ९ हजार कोटी रुपये भरण्यासाठी आर्थिक आराखडा तयार करण्याची गरज आहे. यासाठी आणखी वेळ द्यावा अशी विनंती सुप्रीम कोटार्ला केली.

https://www.facebook.com/mahabatmi365/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘संजय राऊत,निर्लज्जपणालाही मर्यादा असतात…’ भाजपचे नेते का खवळले ?

News Desk

भारत आजही ‘कोरोना’च्या दुसऱ्या स्टेजवरच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

News Desk

महिलांविषयीच्या वक्तव्यामुळे पन्नालाल चांगलेच अडचणीत

News Desk
देश / विदेश

पारंपरिक पौरहित्याला फाटा देत पुतळ्याला फेरे मारून केले लग्न

News Desk

भोपाळ- पारंपरिक विवाहपद्धतीला फाटा देत मध्य प्रदेशातील सिहोरमधील तरुण-तरुणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती फेरे घेऊन सत्यसोधन पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा आहे. पौराहित्य पद्धत हद्दपार करण्यासाठी नव्या पिढीने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊलं मानलं जात आहे.

मध्य प्रदेशमधील कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला

सात फे-या मारून लग्न केले. काही सामाजिक संघटना आणि पुरोगामी नागरिकांच्या मतदीने हे कार्य पार पडले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या जोडप्याने हे लग्न केल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी उचलले पाऊलं क्रांतीकारक असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या कार्यामुळे यापुढे पारंपरिक प्रचलित पौराहित्याची पद्धत हद्दपार होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related posts

नथुराम गोडसे प्रकरणी कमल हासन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

News Desk

सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात येण्याचा निर्णय मागे 

News Desk

केरळमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

News Desk