HW News Marathi
देश / विदेश

‘संजय राऊत,निर्लज्जपणालाही मर्यादा असतात…’ भाजपचे नेते का खवळले ?

मुंबई | ऑक्सिजन अभावी रुग्णांचे जीव गेले नाहीत असं केंद्र सरकारने काल(२१ जुलै) सांगितलं होतं. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकार आपल्याशी खोटं बोलत असून त्यांच्यावर खटला दाखल करायला हवा असं ही त्यांनी सांगितलं होतं. पण राज्याकडूनच असा दावा करण्यात आल्याने संजय राऊतांचीच कोंडी झाली आहे.

भातखालकरांची टीका

भाजप नेते अतुल भातखळकर हे नेहमीच विरोधी पक्षावर टीका करत असतात. केंद्र सरकारला संजय राऊतांनी बोल लावले म्हणून आता भातखालकरांनी त्यांच्यावर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ऑक्सिजनअभावी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. कारण मोदी सरकार सत्यापासून दूर पळत आहे, अशी टीका केली होती. मे महिन्यात ठाकरे सरकारने मुंबई हायकोर्टात राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. केंद्राचे अहवाल हे राज्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच बनतात. केंद्राने तो अहवाल तसाच बनवला. त्यामुळे हा पर्यायाने राज्याच्याच अहवाल असल्याने संजय राऊत यांना धक्का बसल्याचा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला. निर्लज्जपणालाही मर्यादा असतात. सरकारचे खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. राज्यात ऑक्सिजनचे अंत्यत चांगल्या पध्दतीनेत नियोजन झाले. परिणामी ऑक्सिजनअभावी किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे राज्यात एकही रुग्ण दगावला नाही, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला. ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे तारांबळ उडाली होती. अनेकदा टँकर येत असताना तशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने टँकर वेळेवर पोहोचल्यामुळे कुठलीच घटना घडली नाही, असंही त्यांनी सांगितले आहे.

राऊत काय म्हणाले?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले नाहीत, असं केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटलं आहे. हे तुम्हाला पटतं का?, असा सवाल राऊत यांना केला. त्यावर राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तुमचाही खरोखरच विश्वास बसतोय का हे आधी विचारलं पाहिजे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, जे मेडिकल सिलिंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा विश्वास बसतोय का हे सांगायला हवं. सरकार खोटं बोलत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल पण सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हा पेगाससचा परिणाम आहे. सरकार भ्रमिष्ट झालं आहे, असा घणाघाती हल्ला राऊत यांनी चढवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठमोळे मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला

News Desk

नागरिकत्व सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडणार

News Desk

राजस्थानमध्ये आरक्षणासाठी गुर्जर समाजाचा आक्रमक पवित्रा

News Desk