HW News Marathi
देश / विदेश

पंधरा दिवसांत भारत- चीन युद्ध पेटणार

बीजिंग – चीनने गेल्या काही दिवसांत तिबेटमध्ये युद्धसराव चालविला असून, त्याची छायाचित्रे चीनच्या सरकारी वाहिन्यांनी रविवारी प्रसिद्ध केली. तसेच डोकलाममध्ये भारताने माघार न घेतल्यास १५ दिवसांत भारतावर हल्ला करू, असे वृत्त चीनी सरकारचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिले आहे. त्यामुळे येत्या पंधरवड्यात भारत- चीन युद्ध पेटण्याची दाट शक्यता आहे.

चीनी संरक्षण तज्ज्ञांच्या मते, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी दोन आठवड्यांत डोकलाममध्ये भारतीय लष्करावर हल्ला करू शकते. शांघाय अॅकेडमी ऑफ सोशल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विषयांवरचे संशोधक हु जियोंग म्हणाले, ‘भारतीय लष्कर चीनच्या भूभागात असलेले आणखी काही काळानंतर चीन सहन करू शकणार नाही.’

सिक्कीम सेक्टरमधील डोकलाममध्ये भारत, भूतान आणि चीनची सीमा लगत आहे. १६ जूनला चीनी सैन्याने या भागात रस्त्याचे बांधकाम सुरू केले. भारताने चीनच्या घुसखोरीचा विरोध केल्यानंतर हा विषय चिघळला आहे. त्या दिवसापासून तेथील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. चीनच्या घुसखोरीला भूतानने विरोध केला असून, भूतान-चीन सीमा वाद सुटेपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्यासंबंधीच्या कराराचे चीनने उल्लंघन केल्याबद्दल निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, या रस्त्यामुळे भारताचा ईशान्येकडील राज्यांशी असलेला संपर्कच तुटेल अशी भीती भारताकडून व्यक्त होत आहे. तसेच ‘दोन्ही देशांनी आपले लष्कर मागे घेतल्यानंतर या विषयावर चर्चा होऊ शकते. हा विषय सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही,’ अशी स्पष्ट भूमिका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सौदीच्या राजपुत्राला पाकने दिली ‘गोल्डन प्लेटेड सबमशीन गन’

News Desk

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांकडे मोठी जबाबदारी

Darrell Miranda

पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अ‍ॅक्सेस

News Desk