HW News Marathi
देश / विदेश

पर्रिकर चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री

 

संदीप यादव

पणजी – मनोहर पर्रिकर यांनी चौथ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पर्रिकरांना आता दोन दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. पर्रिकर हे तिसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. गोवा मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरांच्या नियुक्तीला काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

दरम्यान याप्ररकऱणी सर न्यायाधीश जे.एस. खेहर यांनी काँग्रेसला अनेक प्रश्न विचारले. तुम्ही गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांची आधीच भेट का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच हायकोर्टाने मनोहर पर्रीकर यांच्या शपथग्रहण सोहळा थांबवण्याची मागणी फेटाळून लावली. मात्र राज्यपालांनी बहुमतासाठी दिलेली 15 दिवसांची मुदत कमी करत 16 मार्च रोजीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. भाजपच्या वतीने सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रीकरांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले आणि 15 दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिला होता.

कोर्टाने काँग्रेसला विचारलेले प्रश्न

– कोर्टाने विचारले, की तुम्ही तुमच्या समर्थक आमदारांची यादी राज्यपालांना दिली होती का? तुमच्याकडे किती सदस्य आहेत? जर तुम्ही आधी राज्यपालांकडे गेले असते आमि नंतर येथे आले असते तर आम्हाला निर्णय घेणे सोपे झाले असते.

– माध्यमातील रिपोर्टरनुसार, काँग्रेसकडे जर बहुमत होते तर त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा का केला नाही? किंवा राजभवनाबाहेर धरेणे का धरले नाही ? जर तुमच्याकडे बहुमत आहे, तर तुमच्या समर्थकांचे अॅफिडेव्हिट सोबत का जोडले नाही, ज्यामुळे सिद्ध झाले असते की तुमच्याकडे बहुमत आहे.

– सुप्रीम कोर्टात काँग्रेसच्या वतीने अभिषेक मनु संघवी यांनी बाजू मांडली, तर सरकारच्या वतीने हरिष साळवी बोलत होते.

पर्रिकर फक्त दोन दिवसांचे मुख्यमंत्री – काँग्रेस

– काँग्रेसचे वकील अभिषेक मनु संघवी म्हणाले, सुप्रीम कोर्टाने आमचे म्हणणे साधारण दीड तास गांभीर्याने ऐकून घेतले. यावेळी आम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले. आमचे म्हणणे होते की राज्यपालांनी संकेतांचे पालन करत सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रित करायला पाहिजे. याशिवाय बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची दिलेली मुदतीचा मुद्दाही आम्ही उपस्थित केला.

– कोर्ट म्हणाले, पर्रीकर बहुमत सिद्ध करु शकले नाही तर दोन दिवसांचे मुख्यमंत्री राहातील.

भाजप घोडेबाजार करत नाही – गडकरी

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गोव्यात हॉर्स ट्रेडिंग (घोडे बाजार) वगैरे काही होत नाही. गैरभाजप सदस्यांच्या काही अटी आहेत. आमदारांनी त्यांच्या संमतीने पाठिंबा दिला आहे.

– काँग्रेसला आपसातील वादामुळे विधिमंडळ पक्षाचा नेता निवडता आला नाही. त्यासाठी आम्हाला दोषी ठरवले जात आहे.

काँग्रेसचे आरोप

– काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंह म्हणाले, विधानसभा निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी (12 मार्च) आम्ही सरकार स्थापनेचा दावा सादर करणार होतो. मात्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रविवारी भेटीसाठी वेळ दिला नाही.

– नियमीत आणि ठरलेल्या प्रक्रियेला फाटा देत राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाऐवजी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले.

– काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की भाजपकडे संख्याबळ नसताना आणि क्रमांक दोनचा पक्ष असतानाही राज्यपालांनी त्यांना दिलेले निमंत्रण घटनाविरोधी आहे. त्यामुळे पक्षाने सोमवारी सायंकाळी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. कोर्टाने होळीची एक आठवड्याची सुटी असताना या प्रकरणासाठी एक विशेष पीठ स्थापन केले.

 

गोव्यातील सत्तासमीकरणे

मॅजिक फिगर 21

काँग्रेस -17

भाजप – 13

गोमंतक फॉरवर्ड पार्टी – 03

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष – 03

राष्ट्रवादी काँग्रेस- 01

अपक्ष – 02

पर्रीकर यांनी राज्यपालांना भेटून आपल्याला 22 आमदारांचा पाठिंबा असल्याचे दाखवून सरकार स्थापनेचा दावा केला होता. गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांचे प्रत्येकी 3, तसेच अपक्ष रोहन खौंटे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष गोविंद गावडे यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता.

आठ आमदार शपथ घेणार

मनोहर पर्रीकर यांच्यासोबत जवळपास आठ आमदार मंगळवारी (दि. 14) शपथ घेतील. गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी व अपक्षांतून प्रत्येकी दोन तर भाजपच्या 2 ते 3 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढचे ३ महिने नागरिकांना गहू २, तर तांदूळ ३ रुपये प्रति किलोने मिळणार

News Desk

बेस्ट टॉयलेट पेपर सर्च करताच पाकिस्तानचा झेंडा, गुगल म्हणते आमचा दोष नाही

News Desk

नितीश कुमार- मोदींचा तिनशे कोटींचा घोटाळा

News Desk