HW News Marathi
देश / विदेश

प्लास्टिक अंड्यानंतर आता रसायनयुक्त अंडी आल्याने खळबळ

सेऊल (वृत्तसंस्था)- दक्षिण कोरियामधील अंड्यांमध्ये घातक रसायने आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अन्न व कृषी विभागाने केलेल्या पाहणीत पाच पोल्ट्री फार्ममध्ये घातक रसायने वापरून अंडी तयार केल्याचे लक्षात आले. ही अंडी आरोग्यास हानीकारक असल्याचा अहवाल या विभागाने दिला असून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अशी अंडी खावू नयेत असे या विभागाने नागरिकांना बजावले आहे. दरम्यान, भारतातील पोल्ट्री फॉर्ममध्येही कोंबड्याचे वजन वाढवण्यासाठी इंजक्शनचा वापर केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उजेडात आल्या होत्या. असे चिकन खाल्ल्याने माणसाची प्रतिकार क्षमता कमी होत असल्याचेही आढळून आले होते. आता अंड्यात रासायनिक घटक आढळून आल्याने आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. काही दिवसांपूर्वी प्लास्टिक अंडी चर्चेचा विषय ठरली होती. आता रसायनयुक्त अंडी नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता बंगाल उपसागराजवळ चीनकडून बंदर उभारले जाणार

News Desk

हिमाचल प्रदेशात दरड कोसळली, ९ पर्यटकांचा मृत्यू

News Desk

काँग्रेसची ऑफर जेडीएसचा पाठिंबा

News Desk
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्सची निर्मिती!

News Desk

मुंबई काँग्रेसला बुडवण्यासाठी निरूपम यांचा हातभार

News Desk

गुजरात निवडणूक 2017 : तारखा जाहीर, दोन टप्प्यात मतदान

News Desk