HW News Marathi
देश / विदेश

बुऱ्हाण वाणीला श्रद्धांजली वाहण्यावरून खोऱ्यात पुन्हा तणाव

जम्मू-काश्मीर- दहशतवादी बुऱ्हाण वाणी याचा खात्मा केलेल्या घटनेला आज एक वर्षे पूर्ण झाले. यावेळी त्याच्या मूळ गावी सुरक्षा रक्षक व त्याच्या समर्थकांमध्ये वाद झाल्याचे पाहवयास मिळाला. काही फुटीरवादी नेत्यांनी चिथावणी देऊन वाणी याला श्रद्धांजली देण्यासाठी त्याच्या मूळ गावी जमा होण्याचे आवाहन केले होते. त्याला सुरक्षा रक्षकांनी विरोध दर्शवल्याने तणावाचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी वाणीच्या ट्राल या मूळगावी जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. तसेच अनेक दुचाक्या गाड्या ताब्यात घेतल्या आहे. वाणी याच्या हत्येनंतर गेल्या वर्षभरापासून काश्मीर खोऱ्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात हल्ले सुरू आहेत. त्यावरून देशाचे राजकारणदेखील तापले आहे. दरम्यान, हिंसा वाढण्याची शक्यता असल्याने तीन ठिकाणी संचारबंदी लागु करण्यात आली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणातील जमिनीसंदर्भात केंद्राच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

News Desk

#SushantSinghRajput | CBI कडून ६ आरोपींसह अन्य संबंधितांवर गुन्हा दाखल

News Desk

परळीतील चक्काजाम आंदोलनादरम्यान खासदार प्रीतम मुंडे पोलिसांच्या ताब्यात

News Desk