HW News Marathi
देश / विदेश

भारताच्या यानाला चंद्रावर सापडले पाणी

नवी दिल्ली – आतापर्यंत चंद्रावर पाणी असल्याची केवळ शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र चांद्रयान मोहिमेअंतर्गत चंद्रावर पाठविण्यात आलेल्या यानाला तेथे भूपृष्ठाखाली मोठ्या प्रमाणात जलसाठे आढळले आहेत. भारतीय चांद्रयान मोहिमेचे हे मोठे यश मानले जात आहे. या संदर्भातील अहवाल अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासालाही पाठविण्यात आला आहे.

नासाच्या ओर्बिटर अवकाश यानाला चंद्रावरबर्फ आणि काही प्रमाणात पाणी आढळले होते, पण भारताच्या चांद्रयानाने चंद्रावरील पृष्ठाभागाखाली मोठय़ा प्रमाणात पाणी असल्याचे पुरावे नासाला दिले. त्या आधारावर ब्राउन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या भूपृष्ठाभागाखाली मोठय़ा प्रमाणावर जलसाठे असल्याचे संशोधन २५ जुलै २०१७ रोजी प्रकाशित केले आहे.

ब्राउन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि पृथ्वी आणि पर्यावरण विभागाचे प्रमुख राल्फ मिलिकेन आणि शुई ली यांनी भारताच्या चांद्रयानची रासायनिक स्पेक्ट्रोमिटरची आकडेवारी, छायाचित्र आणि नासाच्या ‘लुनार रिकानायसन्स ओर्बिटर’ची मिनरल मॅपिंगची माहिती आणि तेथील तापमान याद्वारे संशोधन करून चंद्राच्या भूपृष्ठाखाली मोठय़ा प्रमाणावर जलसाठे असल्याचा निष्कर्ष काढला.

यापूर्वी नासाच्या ओर्बिटरने चंद्राच्या थंड ध्रुवावर पाण्याचे बर्फ असल्याचे पुरावे मिळाले होते. चांद्रयान अवकाश यानामुळे आता ध्रुवाव्यतिरिक्त लाव्हा खडकाखालीसुद्धा पाण्याचे साठे असल्याचे सिद्ध झाले आहे. चंद्रयानच्या स्पेक्ट्रोमिटरने घेतलेले छायाचित्र हे दिवसा घेतल्याने तापमानामुळे पाण्याचा तपास लागत नव्हता, पण शास्त्रज्ञांनी थर्मल इमेजला वेगळे करून पाहिल्याबरोबर स्पेक्ट्रोमिटरच्या साहाय्याने पाण्याचे अवशेष आढळले. हे संशोधन ‘रिमोट डिटेक्शन ऑफ वाईडस्पेस इंडिजिनस वॉटर इन लुनार पायरोक्लास्टिक डिपोझिट’ या शीर्षकाखाली विज्ञान मासिकात प्रकाशित करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतराळात ‘मिशन शक्ती’मुळे ४०० तुकडे, नासाची भीती

News Desk

संयुक्त राष्ट्र संघात भारताचा विजय

swarit

बिहारच्या जनतेला विकास हवा आहे जंगलराज नको आहे – देवेंद्र फडणवीस

News Desk