HW News Marathi
देश / विदेश

शेतकरी आत्महत्येवर झटपट उपाय अशक्य-सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली-देशात शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर असला तरी त्यावर एका रात्रीतून किंवा झटपट तोडगा काढणे अशक्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदविले. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकºयांच्या हितासाठी हाती घेतलेल्या विविध योजनांचे यशापश पाहण्यासाठी काही वेळ देण्यास देखील सर्वोच्च न्यायालयाने संमती दर्शविली.

ज्येष्ठ वकील कोलिन गोंन्साल्विस यांच्या क्रांती स्वयंसेवी संघटनेच्यावतीने शेतकरी आत्महत्येसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यावर गुरुवारी सरन्यायाधीस जे. एस. केहर, व डी. वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सरकारच्यावतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, २०१८ पर्यंत देशातील १२ कोटी शेतकºयांपैकी ५.३४ लाख शेतकºयांना सरकारच्या विविध योजनांचा फायदा दिला जात आहे. ३० टक्के पिकांचा विमा उतरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय असला तरी या संकटातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी सरकारला काही वेळ देण्याचे न्यायालयाने मान्य केले. तसेच या याचिकेवरील सुनावणी सहा महिन्यांनी घेण्याचे निर्देश दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

व्याजदरात बदल नाही, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

News Desk

गंगेचे पावित्र्य राखण्यासाठी कठोर नियम

News Desk

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची बैठक, एकनाथ शिंदेंनी बैठकीनंतर दिली ‘ही’ माहिती

News Desk
देश / विदेश

पारंपरिक पौरहित्याला फाटा देत पुतळ्याला फेरे मारून केले लग्न

News Desk

भोपाळ- पारंपरिक विवाहपद्धतीला फाटा देत मध्य प्रदेशातील सिहोरमधील तरुण-तरुणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती फेरे घेऊन सत्यसोधन पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा आहे. पौराहित्य पद्धत हद्दपार करण्यासाठी नव्या पिढीने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊलं मानलं जात आहे.

मध्य प्रदेशमधील कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला

सात फे-या मारून लग्न केले. काही सामाजिक संघटना आणि पुरोगामी नागरिकांच्या मतदीने हे कार्य पार पडले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या जोडप्याने हे लग्न केल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी उचलले पाऊलं क्रांतीकारक असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या कार्यामुळे यापुढे पारंपरिक प्रचलित पौराहित्याची पद्धत हद्दपार होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related posts

मॅन्चेस्टरमध्ये बॉम्बस्फोट, 20 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी

News Desk

संजय राऊतांनी मला धमकावलं ! मुंबई आता POK का वाटतेय? | कंगना राणावत

News Desk

धक्कादायक ! प्रसूती करण्यापूर्वी दोन डॉक्टर एकमेकांशी भांडत राहिले.. बाळाचा गर्भात जीव गेला

News Desk