HW News Marathi
देश / विदेश

हिमाचलमध्ये सहा जण जमिनीखाली गाडले गेले

नवी दिल्ली : भुसभुशीत भूभागामुळे हिमाचल प्रदेशमधील सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत असतात. शनिवारी घडलेल्या अशाच प्रकारच्या एका घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. मंडी भागात घडलेल्या या दुर्घटनेत अनेक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गवले होते. सुदैवाने त्यातील चौघांना वाचविण्यात यश आले.

जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, मंडीचे उपायुक्त संदीप कदम यांनी दोन जणांच्याच मृत्यूला दुजोरा दिला आहे. भूस्खलनामुळे येथे तीन वाहने फसली असून एक बस महामार्गावरून ८०० मीटर वाहून गेली आहे. त्यातील चार लोकांना भूस्खलनातून वाचवल्याचे त्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे मदत अभियान राबवण्यात पोलीस आणि बचाव पथकाच्या कार्यात अडचणी येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

EVMHacking : ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित !

News Desk

महिला पत्रकारांविषयी भाजप नेत्याची वादग्रस्त फेसबुक पोस्ट

News Desk

वा रे केजरीवाल…केजरीवाल सरकारची कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरी ..

Arati More