HW News Marathi
देश / विदेश

१८ हजारांपेक्षा कमी वेतन देण्यावर लवकरच प्रतिबंध

नवी दिल्ली : वाढत्या महागाईत तुटपुंजा वेतनावर चरितार्थ चालविणे अनेकांना अवघड होते. त्यामुळे किमान वेतन ठरविण्याच्या सूत्रात आणि पर्यायाने किमान वेतन कायद्यात आवश्यक बदल करून किमान वेतनाची मर्यादा १८ हजार रुपये करण्याचे केंद्राने ठरविले आहे. त्यामुळे आता लवकरच कुणालाही १८ हजारांपेक्षा कमी वेतनावर कामावर ठेवण्यावर प्रतिबंध येणार आहेत.

कुटुंबातील सदस्य संख्येनुसार किमान वेतन ठरविण्यात येते. सध्याच्या सूत्रानुसार पती, पत्नी हे दोन सदस्य आणि दोन मुले मिळून एक सदस्य, असे एकूण तीन सदस्यांचे कुटुंब गृहीत धरले जाते. यात बदल करून एका कुटुंबात सहा सदस्य गृहीत धरण्याचा प्रस्ताव श्रम मंत्रालयासमोर विचारार्थ आहे. या प्रस्तावानुसार अवलंबून असलेले आई-वडील यांनाही कुटुंबाचे सदस्य मानण्यात येणार आहे. तसेच दोन मुलांना मिळून एकच सदस्य न मानता स्वतंत्रपणे दोन सदस्य म्हणून गृहीत धरण्यात येईल.या प्रस्तावानुसार किमान वेतनात आपोआप दुप्पट वाढ होईल.

किमान वेतन कायदा १९४८ नुसार किमान वेतन ठरविण्यात येते. हा कायदा ४७ केंद्रीय आस्थापनांना, तसेच देशातील शेती आणि बिगर शेती कामगारांना लागू आहे. या कायद्यानुसार, किमान वेतनाचे सूत्र ठरविण्यात आले आहे. त्यात आता बदल करण्यात येणार आहेत. किमान वेतनाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय; पुनर्गठित करण्यात आलेल्या किमान वेतनविषयक केंद्रीय सल्लागार बोर्डाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यातआला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राकेश अस्थाना यांची चौकशी सुरूच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका

News Desk

राफेलची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत | महाधिवक्ता

News Desk

सेल्फ कोरोंटाईन करताना या बाबी ठेवा लक्षात

swarit
महाराष्ट्र

फळभाज्यांचे भाव गगनाला

News Desk

नाशिक : काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आवक घटली आहे. त्याच वेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरातमध्ये मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. परिणामत; किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहे.

नाशिक बाजारसमितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रूपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रूपये, दोडका ४० रूपये, भोपळा ३० रूपये नग, हिरवे वांगी ३५ रूपये, लाल वांगी ४० रूपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.

पावसाने सध्या उघडीप दिलेली असली, तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजीत आहे. मात्र आगामी काही दिवसात सर्वच फळभाज्या मोठया प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत किमान ४० रुपये प्रतिकिलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८०रुपये प्रतिकिलो दराने खरेदी कराव्या लागत आहेत

Related posts

जळगावात २९ वीजचोरांवर कारवाई

News Desk

काहीतरी पदरात पाडून घ्यावे याच हेतूने अशोक चव्हाण आणि केसरकरांची नाराजी !

News Desk

मंत्री गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजनांच्या घरी!

News Desk