HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्री गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजनांच्या घरी!

जळगाव। पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अचानक भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही एकत्रं अल्पोपहार घेतला. त्यानंतर दोघेही एकाच वाहनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले. राज्य सरकार कोसळण्यावर भाजपकडून दावे केलेले जात असतानाच पाटील यांनी अचानक महाजन यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच पाटील यांनी महाजन यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणं यातुन आता वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत.

पाटील यांनी महाजन यांच्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दोघांनीही एकत्रं अल्पोपहार

जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गुलाबराव पाटील या पूरग्रस्त भागाची आज पाहणी करत आहेत. या पाहणीसाठी जामनेरमध्ये आले असता पाटील यांनी थेट गिरीश महाजन यांचे घर गाठले. यावेळी महाजन यांनीही पाटील यांचं हसतमुखाने स्वागत केलं. पाटील यांनी महाजन यांच्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दोघांनीही एकत्रं अल्पोपहार घेतला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये गप्पाही झाल्या. त्यानंतर दोन्ही नेते एकाच वाहनाने जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पुढे गेले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल, असा दावा भाजपकडून सातत्याने केला जात असताना आज गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांची जाहीर भेट झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

परवाच्या वादळाचीही मदत लवकर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार

दोन तीन दिवसांपूर्वी वादळ आलं होतं. त्यामध्ये जवळपास चार हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तसेच तीनशेहून अधिक घरांवरील छप्पर उडून गेल्याचा अंदाज आहे. बाकीचे पंचनामे सुरू आहे, केळी, कापूस आणि मका या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या नुकसान दौऱ्यात आम्ही सर्व पक्षाचे नेते एकत्र आले असून आम्ही पाहणी करत आहोत. सरकार म्हणून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करू. काही भागात मदत आली आहे. परंतु, काल परवाच्या वादळाचीही मदत लवकर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं पाटील यांनी सांगितलं.

शेतकरी हा कोणत्याही पक्षाचा नाही

आमच्या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढू नये. आज अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी हा कोणत्याही पक्षाचा नाही. पालकमंत्री या नात्याने स्थानिक आमदारांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती जाणून घेणे, हा माझा हेतू होता. ज्या वेळेस राजकीय विषय असेल तेव्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात असू. परंतु, शेतकरी संकटात असताना एकमेकांतील मतभेद आणि राजकारण विसरून आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगत गुलाबराव पाटलांनी भेटी संदर्भातील चर्चेचे खंडन केले.

हा प्रश्न काही राजकारण करण्याचा नाही

चाळीसगावलाही आम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी एकत्रं होतं. हा प्रश्न काही राजकारण करण्याचा नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू, निवडणुका लढवू. पण हे दु:ख खूप मोठं आहे. संपूर्ण शेतकरीच नेस्तनाबूत झाला आहे. अनेक लोकांच्या घरावर पत्रं नाही. राहायला जागा नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आलो आहोत. हे कोणत्याही पक्षावरचं संकट नाही. हे सार्वजनिक संकट आहे. शेतकऱ्यांवरचं संकट आहे. त्यासाठी सर्वांनी मिळूनच काम केलं पाहिजे, असं महाजन म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची जागा शिवसेनेने लढावी”, संजय राऊतांचे विधान

Aprna

उकळते पाणी अंगावर सांडल्याने तीन लहान मुलींचा मृत्यू

News Desk

राज्यात पावसामुळे मृत व्यक्तींचा आकडा १४५ वर

News Desk