HW News Marathi
क्राइम

मोक्ष प्राप्तीसाठी ११ जणांची आत्महत्या

नवी दिल्ली | दिल्लीतील बुराडी येथे राहणाऱ्या भाटिया कुटुंबातील ११ जणांचा मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली होती. एकाच कुटुंबातील ११ जणांची आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या गुन्हे शाखेने तपास करण्यास सुरुवात केली. या आत्महत्येचा संबंध अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी वर्तवलीआहे.

भाटिया कुटुंबातील सात महिला आणि चार पुरुष अशा एकूण ११ जणांचा मृतदेह राहत्या घरी सापडला आहे. पोलिसांना तपास करताना घराच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला ११ पाईप आढळून आल्या. या पाईप मधून पाणी बाहेर पडण्यासाठी कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. या पाईप कशासाठी लावण्यात आल्या आहेत. याचा तपास दिल्ली पोलीस करत आहे. हे संपूर्ण प्रकरण अंधश्रद्धेशी निगडित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण

भाटिया कुटुंब हे दररोज सकाळी ६ वाजता यांचे दोन मजली ग्रॉसरी आणि प्लायवूडचे दुकान उघडत असत. परंतु, रविवारी १ जुलै रोजी ७ वाजून गेले तरी दुकान का बंद होते. बंद दुकान पाहून चौकशी करण्यासाठी शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले. तर घरात हात-पाय बांधलेले आणि डोळ्यावर बांधलेले लोक आढळून आले. तर काहींचे मृतदेह जमिनीवर दिसून आले. हे पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळविले.

मोक्ष प्राप्तीचा मार्ग

दिल्ली पोलीस भाटियांच्या घराची तपास करत असताना एक रजिस्टर सापडले. या रजिस्टरमध्ये कोणी कसे मरायचे आणि कोणाच्या मरण्याची जागा कुठे असेल, यासंबंधी उल्लेख केला आहे. मरताना स्टूलचा वापर करा, डोळे बंद करू आणि हात बांधले तर मोक्ष मिळतो, असा देखील उल्लेख या रजिस्टरमध्ये केला आहे.

या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या तपासाकडे दिल्लीकरांचे लक्ष लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकवीरा देवीचा सव्वा लाखाचा कळस चोरीला

News Desk

मुलापाठोपाठ पित्याचीही आत्महत्या

News Desk

साप चावल्यानं तरूणीचा मृत्यू

News Desk