HW News Marathi
देश / विदेश

२० वर्षांपूर्वी मसूद अजहरची सुटका कोणी केली ?, सिद्धूंचा भाजपला सवाल

नवी दिल्ली | “पुलवामात दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या मसूद अजहरची २० वर्षांपूर्वी कोणी सुटका केली होती ?”, असा खोचक सवाल काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपला केला आहे. “आज जे मला देशद्रोही म्हणत आहेत, त्याच लोकांनी मसूद अजहरची सुटका केली आणि त्याला पाकिस्तानला पाठवले. त्यांनी गेल्या २० वर्षात अझरच्या अटकेसाठी काय केले ?” असा सवाल सिद्धू यांनी विचारला आहे.

“राष्ट्रवाद हाच सर्वात मोठा धर्म आहे. मी माझ्या देशासोबत आहे. देशाचा आवाज हाच माझा आवाज आहे. पुलवामा हल्ल्यानंतर ज्या भावना देशवासीयांच्या मनात आहेत, त्याच भावना माझ्याही मनात आहेत. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे,” असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना भारतात आणून जाहीर फाशी द्या, असे आव्हान देखील सिद्धू यांनी मोदी सरकारला दिले आहे.

“हा हल्ला घडवून आणण्यामागे काही मोजकीच माणसे आहेत. मला केवळ इतकेच वाटते कि, त्यांच्या दुष्कृत्याची शिक्षा सामान्य माणसाला, निष्पाप महिलांना, लहान मुलांना मिळू नये. कारण अशी कृती शीख गुरुंच्या आणि मानवतेच्याही विरोधात आहे. या हल्ल्यामागे असलेल्या प्रत्येकाला शिक्षा मिळायलाच हवी यावर देखील मी ठाम आहे”, अशा शब्दांमध्ये सिद्धू यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिका आर्थिक संकटात

swarit

शहरात नेमके किती खड्डे | सर्वोच्च न्यायालय

News Desk

४०० मुलांचा जीव वाचविण्यासाठी पोलीस बॉम्ब घेऊन धावला!

News Desk