HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील पूंछ, राजौरी जिल्ह्यात उभारणार प्रत्येकी २०० बंकर्स

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले गेले. त्यानंतर भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करून पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त केले. प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव असतानाही पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरघोड्या काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. परिणामी, गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड गोळीबाराचा सामना करावा लागलेल्या पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात अतिरिक्त बंकर उभारण्यास आता जम्मू-काश्मीर प्रशासनाने परवानगी दिली आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे सामान्य स्थानिक नागरिकांना कोणतीही हानी पोहोचू यासाठी पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात प्रत्येकी २०० म्हणजे एकूण ४०० बँकर्स उभारण्यात येणार आहेत. या बॅंकर्सच्या साहाय्याने स्थानिक नागरिक स्वतःचा बचाव करू शकणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या उपायुक्तांकडे यासाठी लागणारा निधी सुपूर्द करण्यात येणार असून त्यानंतर लवकरात लवकर हे बँकर्स उभारण्यात येतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकातील राजीनामा दिलेल्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे सिद्धरामय्यांची मागणी

News Desk

…म्हणून भारताचा आर्थिक विकास वेग कमी झाला, रघुराम राजन यांची टीका

News Desk

लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक हक्क !

News Desk