HW News Marathi
देश / विदेश

देशातील २२ राज्यातील बळीराजा १ जूनपासून संपावर जाणार

मुंबई | महाराष्ट्रात दोन महिन्यापुर्वी शेतकऱ्यांचा लाँग मोर्चा काढला होता. या मोर्चाने संपुर्ण महाराष्ट्र हदरुन गेला होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता देशातील २२ राज्यांतील शेतकरी १ ते १० जून या काळात संपावर जाण्याचा निर्णय राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकरी संपावर गेल्यानंतर १२८ शहरात भाजीपाला अन्नधान्य, दूध आणि इतर शेतमालाचा पुरवठा बंद ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

देशभरातील ११० शेतकरी संघटना एकत्र येऊन राष्ट्रीय किसान महासंघाची स्थापन झाली आहे. या महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाठपुराव केला जाणार आहे. २२ राज्यातील १२८ शहरात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. संपाच्या काळात शेतकरी आपला शेतमाल, दूध, भाजीपाला शहरांमध्ये विक्रीस पाठविणार नाहीत. आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी देखील करणार नाहीत.

या महासंघाने खबरदारी म्हणून ज्या शहरात संप होणार आहे. ती शहरे वगळून इतर शहरात शेतकरी त्यांचा शेतमाल विक्री करु शकते. हे संपूर्ण आंदोलन अंहिसेच्या मार्गानेच केले जाणार आहे. सरकारने याबाबत काही वेगळी भूमिका घेतली तर निर्माण होण्या परिस्थितीला सरकारच जबाबदार राहिल, असे महासंघाच्या कोअर कमिटीचे सदस्य संदीपआबा गिड्डे पाटील यांनी सांगितले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown2 : पंतप्रधानांनी या ‘सात’ गोष्टींमध्ये मागितली भारतीयांची ‘साथ’

News Desk

भारत-पाक सीमेवर २,०६१ पैकी केवळ ६६१ फेन्सिंग लाईट पोल्सच चालू

News Desk

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास उघड का करता येणार नाही ?

News Desk