HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रात काँग्रेसकडून बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न!; मोदींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | महाराष्ट्रात काँग्रेसकडून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. मोदींनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आज (८ फेब्रुवारी) पंतप्रधान राज्यसभेत उत्तर देताना काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे नाव मायलेक काँग्रेस करा, काँग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय आहे, असा घाणाघात मोदींनी काँग्रेसवर राज्यसभेत केला आहे.  

काँग्रेसने नसती तर शीख नरसंहार झाला नसता. काँग्रेस नसती तर कश्मीर पंडितांच्या हत्या झाल्या नसत्या तर काँग्रेस नसती तर गरीबांचा विकास थांबला नसता. काँग्रेस नसती तर आणीबाणीसारखा कलंक लागला नसता, असा हल्लाबोलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.  “महाराष्ट्रातील काँग्रेसने मजुरांना मोफत तिकीट देऊन उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला पाठविले. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली,” असा आरोप पंतप्रधानांनी काल लोकसभेत बोलताना केला.  

मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • लोकशाहीत केवळं बोलायचं नसतं ऐकूनही घ्यायचं असतं
  • काँग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय
  • काँग्रेसचे नाव मायलेक काँग्रेस करा, मोदींची टीका
  • बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करण्याचे काम काँग्रेसने केले
  • काँग्रेसला फक्त घराणेशाहीची चिंता
  • काँग्रेस नसती तर जातीपातीचे राजकारण झाले नसते
  • काँग्रेस नसती तर आणीबाणी लागली नसती, काँग्रेस नसती तर परिवार वाद नसता
  • काँग्रेसन नसती तर शीख नरसंहार झाले नसते, काँग्रेस नसती तर कश्मीर पंडितांच्या हत्या झाल्या नसत्या, काँग्रेस नसती तर गरीबांचा विकास थांबला नसता
  • कोरोना काळात शरद पवार यांनी दौरे केले, शरद पवारांनी अनेक लोकांना प्रेरणा देतात
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे कौतुक केले, आदर्श घ्याचा असेल तर शरद पवारांचा घ्या असे म्हणाले
  • २०१४मध्ये सत्ता गेल्याने विरोधकांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आहेत
  • मोदी सरकारच्या काळात युपीए सरकार पेक्षा कमी महागाई  आहे
  • युपीएच्या काळात महागाई ही डबल डिजीत होती
  • संरक्षण क्षेत्रात २०० कोटींपर्यंतचे कंत्राट भारतीय कंपनीला दिले
  • संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर बनतोय
  • ५ कोटी लोकांपर्यंत पेयजल योजना पोहोचवली
  • लघु-मध्यम उद्योगात भरीव कामगिरी केली आहे. 
  • अनेक गरिबांना हक्काची घरे मिळाली
  • कोरोनाकाळात कोणी उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली.
  • ८० कोटी नागरिकांना मोफत अन्न-धान्य मिळाले
  • कोरोना काळात भारताने जगला औषध पुरविले
  • कोरोना काळात विकासाचा कोणताही प्रॉजेक्ट बंद ठेवला नाही. 
  • भारताच्या लीडशिपचे जगभरातून कौतुक झाले
  • लसीकरणात देशाने मोठी आघाडी 
  • डॉक्टर आणि कोव्हिड योद्धांचा कोरोना काळातील त्यांच्या कामाचे गौरव केला
  • जगभरात भारताच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक होत आहे
  • देशाच्या गतिमान करण्यासाठी केंद्री सरकार कटिबद्ध
  • पुढील २५ वर्षासाठी रोड मॅप ठरविणे महत्तवाचे आहे
  • देशात अनेक विकास कामे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

‘किंगमेकर’ भगतसिंह कोश्यारींच्या शब्दांचा मंत्रिमंडळ फेररचनेत ठसा 

News Desk

बाळासाहेबांना अपेक्षित महाराष्ट्र घडवणं, संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारणं हीच खरी आदरांजली !

News Desk