HW News Marathi
देश / विदेश

विमानात अडकले २३४ प्रवासी

मुंबई – ऐन उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावर तब्बल तीन तास थांबविण्यात आले होते. त्यामुळे विमानात २३४ प्रवासी अडकून पडले. त्यातच भर म्हणून विमानाची वातानुकूलन यंत्रणाही बंद पडल्यामुळे प्रवाशांना श्वास कोंडलेल्या अवस्थेत घामाघूम होऊन बसावे लागले.

एआय ८०९ हे विमान सकाळी सव्वाअकरा वाजता मुंबईतून दिल्लीस प्रयाण करणार होते. ते अखेर दुपारी अडीचच्या सुमारास हवेत झेपावले. ‘विमानात चढण्याच्या दोन तास आधी आम्ही विमानतळावर आलेलो असतो, त्यात आणखी या बिघाडामुळे आमचे पार हाल झाले,’ असे उद्विग्न प्रवाशांनी सांगितले. विमानास विलंब का झाला, याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांसह विरोधीपक्षातील दिग्गजांचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींची भेट घेणार

News Desk

मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारने दाखल केली पुनर्विचार याचिका

News Desk

लॉकडाऊन कालावधीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही !

News Desk
मुंबई

भिंडेना आठ दिवसांत अटक करा, नाही तर विधान भवनाला घेरा घालू

News Desk

मुंबई | भिमा-कोरेगाव प्रकरणी मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसात अटक करा, नाही तर विधान भवनाला घेराव घालू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आझाद मैदानातील ‘एल्गार मोर्चा’त प्रकाश आंबेडकर बोलत होते.

भिमा-कोरेगाव प्रकरणाला तीन महिने पूर्ण झाले असून सुद्धा मुख्य आरोपी संभाजी भिडे अद्यापही मोकाट फिरत आहे. त्यामुळे हा एल्गार मोर्चा काढण्यात आला. सरकार संभाजी भिंडे याला जावयासारखी वागणूक का देत आहेत असा सवाल आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला. या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी अटक केले आहे.

Related posts

नगरसेवकांचे ‘प्रजा फाऊंडेशन’कडून प्रगतिपुस्तक जाहीर

News Desk

हिंदुजा महाविद्यालयाला अवैध पार्किंगचा विळखा, वाहतुक पोलिस शाखा बघ्याच्या भुमिकेत

News Desk

मुंबईत १००० मुला-मुलींसाठी वसतीगृह सुरू करण्याची मागणी

swarit