HW News Marathi
देश / विदेश

विमानात अडकले २३४ प्रवासी

मुंबई – ऐन उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावर तब्बल तीन तास थांबविण्यात आले होते. त्यामुळे विमानात २३४ प्रवासी अडकून पडले. त्यातच भर म्हणून विमानाची वातानुकूलन यंत्रणाही बंद पडल्यामुळे प्रवाशांना श्वास कोंडलेल्या अवस्थेत घामाघूम होऊन बसावे लागले.

एआय ८०९ हे विमान सकाळी सव्वाअकरा वाजता मुंबईतून दिल्लीस प्रयाण करणार होते. ते अखेर दुपारी अडीचच्या सुमारास हवेत झेपावले. ‘विमानात चढण्याच्या दोन तास आधी आम्ही विमानतळावर आलेलो असतो, त्यात आणखी या बिघाडामुळे आमचे पार हाल झाले,’ असे उद्विग्न प्रवाशांनी सांगितले. विमानास विलंब का झाला, याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मदुराईत १०० किलो सोने जप्त, देशातील सर्वात मोठी कारवाई

News Desk

केरळमध्ये एका दिवसात पावसाचे १०६ बळी

News Desk

“सकाळी पेपर वाचल्यावर अर्थमंत्र्यांना व्याजकपातीसंदर्भात समजलं असावं की..” – प्रियंका चतुर्वेदी

News Desk
देश / विदेश

रद्द केलेल्या तिकीटमधून रेल्वेची १४०० कोटींची बेगमी

News Desk

नवी दिल्ली : रेल्वेचे आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठीचे शुल्क वाढविल्याचा रेल्वेला चांगलाच फायदा झाला आहे. प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांच्या शुल्कातून रेल्वेने २०१६-१७ या आर्थिक वर्षात तब्बल १४०० कोटी रुपयांची बेगमी केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण करण्याबरोबरच आरक्षण रद्द करणेही रेल्वेच्या पथ्यावर पडत आहे.

तिकीट रद्द करण्यासाठीच्या शुल्कामध्ये रेल्वेने नोव्हेंबर २०१५ मध्ये दुप्पट वाढ केली. त्यामुळे वर्षभरात १४00 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहीती रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी राज्यसभेत दिली. नोव्हेंबर २०१५ पासून प्रवाशाने एसी ३ टियरचे तिकीट ४८ तासआधी रद्द केल्यास १८० रुपयांचे शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. त्याआधी ही रक्कम केवळ ९० रुपये होते. याच पद्धतीने एसी २

टियरचे तिकिट रद्द केल्यास १०० रुपयांऐवजी २०० रुपये शुल्क आकारणे सुरू झाले. तसेच स्लीपर क्लासमधील कन्फर्म तिकिट रद्द केल्याबद्दल प्रवाशांकडून ६०रुपयांऐवजी १२० रुपये आकारणे सुरू केले आहे आणि सेकंड क्लासचे तिकिट केल्यास त्यासाठी ३० ऐवजी ६०रुपये शुल्कआकारणी सुरू केली आहे.

याशिवाय प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास रेल्वे त्या आसनावर अन्य प्रवाशांची व्यवस्था करतेच. त्यामुळे तिथेही पैसा मिळतो. त्यापैकी अनेक तिकिटे तत्काळद्वारे घ्यावी लागतात आणि अर्थातच त्यासाठी प्रवाशांना जादा पैसा मोजावा लागतो. यासर्व गोष्टींमुळे रेल्वेचा महसूल वाढत आहे.

Related posts

“फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या ५ वर्षे अगोदरच झालं” पडळकरांची थोरातांवर शेलक्या शब्दांत टीका

News Desk

काँग्रेस सरकारच्या काळात तुरुंगात असताना माझा प्रचंड छळ झाला !

News Desk

पुन्हा दरवाढ ; पेट्रोल, डिझेल महागले

News Desk