HW News Marathi
देश / विदेश

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात ३ भारतीयांचा मृत्यू

नवी दिल्ली | श्रीलंकेचे राजधानी शहर कोलंबोमध्ये तब्बल ८ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ३ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत २१५ जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांपैकी ३५ हून अधिक लोक हे परदेशी नागरिक आहेत. आतंकवाद्यांनी ईस्टर संडेचा दिवस साधत श्रीलंकेतील ३ चर्च आणि ५ हॉटेल्सवर हल्ला केला. दरम्यान, कोणत्याही आतंकवादी संघटनेने अद्याप या हल्ल्यांची जबाबदारी घेतलेली नाही.

हॉटेल सिनामॉन ग्रँडमध्ये मोहम्मद आजम नामक एका आत्मघातकी आतंकवाद्याने ईस्टर संडेच्या नाश्त्यासाठी रांग लावून तेथेच आत्मघातकी बॉम्ब हल्ला केला. कोलंबो पोलिसांनी १० दिवसांपूर्वीच या हल्ल्याबाबतचा इशारा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार कोलंबोमधील बंडारानायके इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणखी एक बॉम्ब मिळाला होता. मात्र, याबाबतची माहिती मिळताच हा बॉम्ब डिफ्युज करण्यात आला आहे. श्रीलंकेच्या वायू दलाने तपासानंतर सांगितल्यानुसार, हल्ल्यात वापरण्यात आलेले आयईडी बॉम्ब हे श्रीलंकेतच तयार करण्यात आले होते.

आतापर्यंत श्रीलंकेतील या बॉम्बब्लास्टशी संबंधित १३ जणांना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेची सध्याची स्थिती पाहता येथे काल (२१ एप्रिल) रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. इतकेच नव्हे तर येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आज (२२ एप्रिल) संपूर्ण श्रीलंकेत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एनडीटीव्हीचे प्रमोटर प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्यावर सेबीची मोठी कारवाई

News Desk

Republic Day | जाणून घ्या…“ऐ मेरे वतन के लोगो…” या हृदयस्पर्शी गीताचा इतिहास

News Desk

“मोदींच्या मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना-राष्ट्रवादीचाच”

News Desk