HW News Marathi
देश / विदेश

झारखंडमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

रांची | झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज (२९ जानेवारी) पहाटे चकमक झाली. या चकमकी दरम्यान पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच घटनास्थळावरून मोठ शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

सिंहभूम जिल्ह्याच्या खूंटी-चाईबासा सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली होती. या भागात नक्षलींविरोधात सुरक्षा दलांनी अभियान राबवले होते. शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एकूण पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन २ एके ४७, २ पिस्तूल आणि एक ३०३ रायफल असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेसाठी नोटाचा वापर करता येणार

News Desk

शरद पवारांनी अमित शहांची भेट घेतली? महाविकासआघाडी सरकारची समीकरणे बदलणार?

News Desk

ठरलं ! बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार १५० जागा

News Desk