HW News Marathi
देश / विदेश

ऑक्सिजनअभावी 63 बालकांचा मृत्यू,

योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधील धक्कादायक घटना

लखनौ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपर येथील बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आतापर्यंत ६३ बालके दगावली आहेत. शुक्रवारी तीस बालके दगावली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा यात वाढ होऊन 63 झाली आहे. थकीत बिल मिळाले नाही, म्हणून ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्सने ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. त्यामुळे ही दुर्देवी घटना घडली आहे. कंपनीचे एकूण ६८,५८,५९६ रुपये रुग्णालयाकडे थकले आहेत. थकीत बिल चुकवले नाही तर कंपनीकडून केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराही कंपनीने पत्राद्वारे दिला होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे मुख्मंत्र्यावर सर्व थरातून टीका होत आहे. नातेवाईकांचा रुग्णालयाबाहेर आक्रोश सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा काढलीय ! आशिष शेलारांची जहरी टीका

News Desk

अमित शहांच्या मुलांची संपत्ती १६ हजार पटींनी वाढली

News Desk

HW Exclusive | प्रत्येकवेळी महाविकासआघाडीत वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न !

News Desk
महाराष्ट्र

बिफ बाळगणे गुन्हा ठरणार नाही, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का

News Desk

नवी दिल्लीः बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरत नाही, असेमुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून यामुळे राज्यसरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

राज्य सरकारने १९९५ च्या पशु संवर्धन कायद्यात दुरुस्ती केली असून बीफ जवळ बाळगणे गुन्हा समजण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, हा प्रकार म्हणजे खासगीपणाचे उल्लंघन असल्याची टिप्पणी करत उच्च न्यायालयाने ही तरतूद रद्द ठरवली होती. बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरवण्याची तरतूद घटनाविरोधी आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राज्यसरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पडू द्यावी । उदयनराजे भोसले 

swarit

मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील- नवाब मलिक

News Desk

‘आरे’साठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna