HW News Marathi
देश / विदेश

ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा काढलीय ! आशिष शेलारांची जहरी टीका

मुंबई । राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मोठा राडा झाला. OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज (५ जुलै) विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेचे रूपांतर मोठ्या राड्यात झाले. या सगळ्यात भाजप अनेक आमदार थेट तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेले आणि यावेळी या आमदारांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांवर वर्षभराच्या निलंबनाची कारवाई झाली. ह्या प्रकारानंतर दाद मागण्यासाठी भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्यासह १२ आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या तब्बल ३५ मिनिटांच्या चर्चेनंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची सविस्तर माहिती दिली.

आशिष शेलार आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले कि, “भाजपच्या आम्हा १२ आमदारांना निलंबित करण्याचे षडयंत्र ठाकरे सरकारने केले. त्याचे सत्यकथन आम्ही माननीय राज्यपालांसमोर ठेवले आहे. आम्ही यावेळी राज्यपालांना विनंती केलीय कि ज्या आरोपांवर आमचं निलंबन केलं गेलं त्याचा अहवाल राज्यपालांनी मागवावा. आणि तो अहवाल बघितल्यानंतर आमच्या निवेदनावर आणि आमच्या निलंबनावर उचित कार्यवाही राज्यपालांनी करावी. आमचं संपूर्ण ऐकून घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून उचित निर्णय करू अशी ग्वाही राज्यपालांनी आम्हाला दिली. तसेच आम्ही सभागृहात किंवा दालनात कुठेही भाजपच्या कोणत्याही आमदाराने अपशब्द उच्चारला नाही. संबंधित कारवाई ही एकतर्फी कारवाई आहे. यावेळी आम्हाला आमचे म्हणणे मांडायलाच दिले नाही. हे असे करून ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा काढली आहे”, अशी अत्यंत जहरी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभा निवडणूक वेळेवरच, मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

News Desk

दुर्दैवाने पक्षाने २ निष्ठावान युवा नेते गमावले – प्रिया दत्त

News Desk

दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमारची याचिका फेटाळली

News Desk