HW News Marathi
देश / विदेश

#Coronavirus : दिलासादायक ! काल एकाच दिवशी ७०५ जण कोरोनामुक्त

नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधितांचा आकडा हा १८ हजारांच्याही पुढे गेला आहे. तर आत्तापर्यंत ३२५२ कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाले आहेत. रोज रुग्णालयातून रुग्ण बरे होऊन घरी जाताना दिसत आहेतच. मात्र, काल (२० एप्रिल) एकूण ७०५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आत्तपर्यंत एकाच दिवशी इतके रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामूळे जरी कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी मोठ्या संख्येने लोकं बरी होऊन घरी जात असल्याचे समाधानही आहे.

या बद्दलची अधिक माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. जशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तशीच कोरोनामुक्त होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

१५ एप्रिल १८३, १६ एप्रिल २६०, १७ एप्रिल २४३, १८ एप्रिल २८९, १९ एप्रिल ३१६ आणि २० एप्रिल ७०५ अशी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आहे. महाराष्ट्रात ५७२, दिल्लीत ४३१, केरळ ४०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, बरे होण्याची टक्केवारीही वाढत चालली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्रिपुराच्या राज्यपालांची अति घाई, मृत्यूपूर्वीच वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली

News Desk

‘जनता कर्फ्यू’ असूनही शाहिनबागमधील आंदोलन सुरुच राहणार

swarit

#Oscars2022 : पत्नीवर केलेल्या ‘जोक’वर स्मिथने थेट सूत्रसंचालकाच्या कानशीलात लगावली, पुरस्कार मिळाल्यानंतर माफीनामा

Aprna