HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये दहशतवादी-जवानांमध्ये झालेल्या चकमकीत ८ नागरिकांचा मृत्यू

काश्मीर | काश्मीरमधील कुलग्राम जिल्ह्यातील लर्रू परिसरात काल (२१ ऑक्टोबर)ला दशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. या चकमकीत ८ जणांचा मृत्यू झाला असून ४३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात ५ जण जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुलग्राम जिल्ह्यातील एका घरामध्ये चार ते पाच दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कुलग्राममध्ये भारतीय लष्कराला मिळालेल्या माहितीनुसार एका घरात दहशतवादी लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे भारतीय लष्करांनी ३ दहशतवाद्यांना मारण्यात यश आले आहे.

या दहशदवाद्यांना ठार केल्यानंतर जमावाने लष्करावर दगडफेक केल्यानंतर देखील दहशतवादी लपलेल्या घरात घुसून त्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. या दरम्यान त्या घरातील विस्फोटक फुटला. त्यामुळे ५ जणांचा जागीच ठार झाले. परंतु जवळपासचे ४३ पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना कुलग्राम, श्रीनगर व अनंतनाग जिह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी न जाण्याची सुचना वळोवेळी देऊन देखील नागरिक दशतवादी लपलेल्या घरात घुसण्याच्या प्रयत्न करत असताना एका स्फोटकाचा धमाका झाला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या वाढदिवसापूर्वी कॉँग्रेसने वाटले ‘अच्छे दिन’चे लाडू

News Desk

लवकरच रामदेवबाबांची जिन्सही बाजारात!

News Desk

राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला

News Desk