HW News Marathi
देश / विदेश

राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप! काँग्रेसच्या ८२ आमदारांनी दिला राजीनामा

मुंबई | राजस्थानमध्ये (Rajasthan) मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या समर्थक ८२  आमदारांनी काल (25 सप्टेंबर) रात्री उशिरा विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांच्याकढे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. या सर्व आमदारांचा माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध दर्शवित आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.  एकीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची देशभरात ‘भारत जोडो ‘ यात्रा सुरू असतानाच राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात राजकीय वातारवण तापले आहे. तर राजस्थानमधील आपले मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पॅटर्न वापरत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वीच या आमदारांनी आपला राजीनामा सुपूर्द केले आहे. गेहलोत काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसचे ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे गेहलोतांना मुख्यमंत्री पद सोडावा लागणार आहे. येत्या १७ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. विधिमंडळ गटाचा नवीन नेता निवडण्यासाठी काल रात्री उशिरा आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे प्रभारी अजय माकन आणि पक्षनिरीक्षक मालिकर्जून खर्गही  त्याचसोबत सचिन पायलट सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत केवळ नेता निवडीचे सर्वाधिकार केंद्रीय नेतृत्वाला देण्याची औपचारिक्ता पार पडली जाणार असल्याचे गेहलोत यांनी स्वतः जाहीर केले होते. मात्र, गेहलोत समर्थक आमदार बैठकीकडे उपस्थित न राहता ते मंत्री शांती धारिवाल यांच्या बंगल्यावर जमून बसमधून विधानसभा अध्यक्ष यांच्या घरी गेले. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास या आमदारांनी विरोध केला आहे. यावेळी अपक्षांसह सुमारे ८२ आमदार एकत्र असल्याचा दावा करण्यात आला असून याला अजून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या जागी पायलट यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवायचा निर्णय काँगेस नेतृत्वाने घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे पायलट आणि गेहलोत यांच्यामध्ये पुन्हा सत्तासंघर्षांची ठिणगी पडली आहे. यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीवर तोडगा काढण्याची कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case : पी. चिदंबरम यांना दिलासा नाहीच, पुढील सुनावणी शुक्रवारी

News Desk

पश्चिम बंगाल व्यतिरिक्त ‘या’ राज्यांत सीबीआयला बंदी

News Desk

तामिळनाडूत ‘गाजा’ चक्रीवादळाचा धोका, ७६ हजार लोकांचे स्थलांतर

News Desk