HW News Marathi
देश / विदेश

जगातील सर्वांत उंच गावात दुष्काळ

कोमिकरस्तामार्गे जोडलेले जगातील सर्वात उंच गाव अर्थात हिमाचल प्रदेशातील कोमिक, इथे दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या गावातील जलस्रोत आटत असल्याने तेथील शेती आणि मानवी जीवन संकटात आले आहे.

नेपाळमधील धो तारप अथवा बोलिव्हिया येथील सांता बार्बरा ही गावे अतिशय उंचीवर आहेत. मात्र, हिमाचल प्रदेशातील कोमिक गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ते उर्वरित देशाशी रस्तामार्गे जोडले आहे. हे गाव तब्बल चार हजार ५८७ मीटर (१५ हजार ५० फूट) उंचीवर आहे. एवढ्या दुर्गम भागात वसलेल्या या गावात केवळ १३० ग्रामस्थ आहेत. हिवाळ्यात या गावात पारा शून्याखाली घसरतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या गावाला तापमानवाढीचा मोठा फटका बसत आहे.

या गावात सातू आणि हिरवा वाटाणा मोठ्या प्रमाणावर पिकतो. परंतु त्यासाठी आवश्यक पाणी मिळेनासे झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हिवाळ्याच्या दिवसात होणारा हिमवर्षाव या शेतीसाठी फायदेशीर असतो. या हिमवर्षावामुळे नदी, ओढे, तळी सुजलाम होऊन वाहू लागतात. गेल्या काही वर्षांपासून पुरेसा हिमवर्षाव होत नसल्याने येथील स्पिती नदी, ओढे, तळी आटल्याचे भयावह चित्र दिसत आहे. स्पितीचे पाणी कालव्यामार्गे तळ्यात आणून त्याच्या आधारे शेती करण्याचे तंत्र येथील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून आत्मसात केले आहे. मात्र हिमवर्षावातच घट झाल्याने उपलब्ध जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत.

आम्हाला या दुर्गम भागात राहण्याची आता सवय झाली आहे. आम्ही पारंपरिक पद्धतीने जगतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्र बदलताना दिसत आहे. पाण्याचे एवढे कमी प्रमाण आम्ही कधीही पाहिले नव्हते. यामुळे आमची शेती व जगणेच धोक्यात आले आहे, अशी व्यथा नवांग फुन्चोक या ३२ वर्षीय शेतकऱ्याने मांडली. रस्त्याने जोडलेले असल्याने पर्यटन व व्यापाराच्या माध्यमातून आमच्या गावात सुबत्ता येईल, अशी आशा होती. मात्र तसे काहीच न घडल्याने आम्ही निराश झालो आहोत, अशी प्रतिक्रिया तेन्झिन आंदक या ५५ वर्षीय शेतकऱ्याने दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले’, सचिन सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

News Desk

सर्जिकल स्ट्राईकचा हिरो लान्स नायक संदीप सिंह यांना वीरमरण

swarit

कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी थोबाड फोडणार !, शिवसेना आक्रमक

News Desk
देश / विदेश

मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरा करणे आरोग्याला घातक

News Desk

वॉशिंग्टन – घरातील सुवासिनींकडून औक्षण करून घेऊन, देवापुढे दीप लावून वाढदिवस साजरा करण्याची आपली परंपरा आहे. त्याला बगल देत आपण सध्या पाश्चात्यांचे अंधानुकरण करीत आहोत. सरत्या वया इतक्या मेणबत्त्या पेटवून केकवर लावायच्या आणि फुंकर घालून विझवायच्या अशी नवी टूम हल्ली आली आहे. मात्र ही मेणबत्ती विझविण्याची पद्धत आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या पद्धतीमुळे वाढदिवसाच्या केकवरील जंतूंची संख्या तब्बल १४०० टक्क्यांनी वाढते, असेसंशोधकांचे म्हणणे आहे.

वाढदिवसाच्या दिवशी केक सजवून ठेवलेला असतो, त्यावर मेणबत्ती लावलेली असते व ती फुंकर मारून विझवली जाते. पण अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनीकेलेल्या संशोधनानुसार, यामुळे केकवरील जंतू वाढून आरोग्याला धोका निर्माण होतो. जर्नल ऑफ फूड रीसर्च या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून प्राचीन ग्रीसमध्ये शिकारीची देवता असलेल्या आर्टेमिसच्या मंदिरात मेणबत्ती पेटवून बरोबर केक आणण्याची पद्धत होती. इतर संस्कृतीतील आख्यायिकेप्रमाणे मेणबत्तीचा धूर हा सदिच्छा व प्रार्थना देवापर्यंत पोहोचवतो. अनेक देशात ही परंपरा आहे, पण जेव्हा आपण मेणबत्तीवर फुंकर मारतो तेव्हा मानवी श्वासातील बायोएरोसोलमधील जिवाणू केकच्या पृष्ठभागावर बसतात. एरोसोल केकवर गेल्याने हा धोका निर्माण होतो. संशोधकांनी मेणबत्तीवर फुंकर मारल्यानंतरचे केकचे नमुने घेऊन तपासणी केली असता त्यात जिवाणू मोठय़ा प्रमाणावर आढळले. त्यामुळे जिवाणूंचे प्रमाण १४०० टक्के वाढते असे दिसून आले.

 

Related posts

राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी कराः नाना पटोले

News Desk

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रुग्णालयात केले दाखल

News Desk

राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला निवडणूक

News Desk